moon google
विज्ञान-तंत्र

चंद्र शोषतोय पृथ्वीवरील पाणी - शास्त्रज्ञांचा अभ्यास

हे पाणी पृथ्वीवरून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नमिता धुरी

मुंबई : चंद्रावर पाणी असल्याचा शोध २००८ साली भारताच्या चांद्रयान मोहिमेत लागला. त्यानंतर आता हे पाणी कुठून येते याचा शोध लागला आहे. हे पाणी पृथ्वीवरून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

University of Alaska Fairbanks Geophysical Instituteच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण पृथ्वीच्या वरच्या स्तरातील वातावरणातून निसटत आहेत आणि ते चंद्रावर जाून साचत आहेत. चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील पाण्याच्या स्रोताचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला.

चंद्राच्या हवाविरहीत जगातील पाण्याचे साठे वापरण्यास कठीण आहेत कारण, अमेरिका, युरोप आणि चीन येथील अंतराळवीर चंद्रावरून उतरून पृष्ठभाग तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर बेस कॅम्प तयार करणार असून पृथ्वीवरून चंद्रावर गेलेल्या पाण्याचे कण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

पृथ्वीच्या वातावरणातून उडत गेलेल्या कणांपासून तयार झालेल्या पाण्याचा ३ हजार ५०० घन किमीमीटर पृष्ठभाग चंद्रावर असण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणातून पाण्याचे कमीत कमी किती कण बाहेर पडू शकतात आणि त्यापैकी किती चंद्रावर पोहोचू शकतात यांची तुलना करून हा अंदाज लावण्यात आला आहे.

पृथ्वीच्या magnetosphereच्या शेपटातून चंद्र प्रवास करत असताना पृथ्वीच्या वातावरणातील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण उडून चंद्रावर जातात. चंद्राच्या मासिक पाच दिवसीय फेरीच्या वेळी ही प्रक्रिया घडते. यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर चंद्राचा प्रभाव पडतो. परिणामी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण चंद्रावर आदळतात आणि त्यापासून पाणी तयार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT