UPI
UPI  sakal
विज्ञान-तंत्र

UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? मग पाच गोष्टी लक्षात ठेवा

Aishwarya Musale

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वापरला जात आहे. UPI ची सुरुवात भारतातून झाली असली तरी हळूहळू संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. UPI सर्वांपर्यंत पोहोचला आहे, पण त्यात अनेक समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे पेमेंट अडकणे. अनेकवेळा बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने तर कधी इंटरनेटमुळे पेमेंट अडकून पडते. आज आम्ही तुम्हाला UPI पेमेंटमधील काही समस्या आणि त्यांच्या उपायांबद्दल सांगणार आहोत.

UPI पेमेंट लिमिट चेक करा

UPI पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तर पेमेंट थांबवले जाऊ शकते.

बँक सर्व्हर इश्यू

UPI पेमेंट फेल होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बँक सर्व्हर इश्यू. कोणत्याही बँकेचा सर्व्हर कधीही निकामी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करून ठेवा. पेमेंट करताना काही अडचण आल्यास, तुम्ही बँक अकाऊंट बदलून लगेच पेमेंट करू शकता.

UPI पिन

तुम्ही UPI पिन चुकीचा टाकल्यास, पेमेंट अडकू शकते किंवा फेल होऊ शकते. अशा परिस्थितीत पिनचीही काळजी घ्या. तुम्ही पिन विसरला असल्यास, तो रीसेट करा.

इंटरनेट कनेक्शन

UPI पेमेंटसाठी इंटरनेट कनेक्शन खूप महत्वाचे आहे. इंटरनेट कनेक्शनमध्ये काही समस्या असल्यास तुमचे पेमेंट थांबू शकते. फोनमध्ये सिग्नल कमी असल्यास पेमेंट करू नका किंवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन पेमेंट करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT