Sindhudurg 
टूरिझम

भटकंती : चिरेबंदी इतिहासाचा अनुभव (सिंधुदुर्ग)

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सर्वाधिक आकर्षण असलेलं ठिकाण म्हणजे मालवण. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ते प्रसिद्ध आहे.

मालवणच्या चिवला किनाऱ्यावर उभं राहिलं, की समोर भर सिंधुसागरात दिसतो सिंधुदुर्ग किल्ला. चार शतकांहून अधिक काळ समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी आजही तेवढीच मजबूत आहे. सतराव्या शतकात २५ नोव्हेंबर १६६४मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते कुरटे नावाच्या खडकाळ बेटावर पायाभरणी झाली. मोरयाचा दगड या नावानं ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून, त्या जागी महाराजांनी पूजा केली. तटबंदीच्या पायासाठी दोन हजार खंडीहून (सुमारे आठ टन) अधिक लोखंडाचा वापर करण्यात आला. तटबंदीसाठी बेटावरचेच दगड वापरण्यात आले. दोन दगडांमध्ये मजबुतीसाठी शिसं वापरण्यात आलं. काम पूर्ण करण्यास तीन वर्षं लागली. ज्या चार मच्छिमार बांधवांनी ही जागा शोधली, त्यांना गावं इनाम देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण किल्ला एकूण ४८ एकरांवर आहे. तटाची उंची ३० फूट असून रुंदी १२ फूट आहे. तटबंदीची एकूण लांबी सुमारे तीन किलोमीटर आहे. तटबंदीमध्ये २२ बुरूज आणि ४५ दगडी जिने आहेत. किल्ल्यात आणखी एक चमत्कार आहे. भर समुद्रातल्या या किल्ल्यात दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशा गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवीसन १६९५मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शंकराच्या रूपात शिवराजेश्‍वर मंदिर बांधलं. 

आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस आहे. तटाजवळ बोटीतून उतरल्यानंतर उत्तराभिमुख खिंडीतून आत गेल्यानंतरच हे प्रवेशद्वार दिसतं. आत प्रवेश केल्यानंतर मारुतीचं एक छोटं मंदिर आहे. बुरुजावर जाण्याचा मार्ग इथंच आहे. 

किल्ल्याच्या पश्‍चिम भागात जरीमरीचं मंदिर आहे. किल्ल्यात २२८ फूट उंचीचा ध्वजस्तंभ होता. खूप दूरवरून तो सहज दिसत असे. गडावर बहुतेक बुरुजांवर तोफा होत्या. शत्रूवर मारा करण्यासाठी बंदुकांसाठी झरोके आहेत. भारत सरकारनं २१ जून २०१० रोजी हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. किनाऱ्यावर स्नॉर्केलिंग, विविध प्रकारच्या बोट राइड्स, चिवला आणि जवळच प्रसिद्ध तारकर्ली बीच आहे. मालवण परिसर सागरी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT