Beach 
टूरिझम

भारतातील ही आहेत सुंदर 10 बीच..येथे नक्की भेट द्या!

भारतातील हे बीच परदेशातील सुंदर समुद्री किनाऱ्यांची अनुभूती देतात.

भूषण श्रीखंडे

जळगावः भारताला (India) विस्तृत समुद्री किनारा (Beach) लाभलेला असून अविश्वसनीय सुंदर किनारे देखील आहेत. जे आपलेल्या परदेशातील सुंदर समुद्री किनाऱ्यांची अनुभूती देतात. चला तर जाणून घेवू भारतातील खास समुद्रकिनारे ज्याचे सौदर्यं आहे अदभूत..

मरीना बीच

मरीना बीच

चेन्नईचे सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणजे मरीना बीच आहे. जे स्थानिक तसेच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते. मरीना बीचचा 13 किमीचा लांबीचा असून देशातील सर्वात लांब नैसर्गिक शहरी समुद्रकिनारा आहे. तर जगातील दुसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे.

कळंगुट बीच

कळंगुट बीच, (गोवा)

गोव्यातील कळंगुट बीच हे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असून या बिचला समुद्रकिनाऱ्याची राणी अशी देखील एक ओळख आहे. येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग, केळी राईड आणि जेट स्कीइंग सारख्या खेळाचा आनंद घेता येतो. गोव्याला जाणारे बहुतेक पर्यटक या बीचला आवर्जून भेट देतात.

पुरी बीच

पुरी बीच (ओरिसा)

ओरिसा नैसर्गिक संपन्न असून येथील पुरी बीच प्रसिध्द आहे. येथे सूर्य मंदिरापासून 35 किमी आणि भुवनेश्वरपासून 65 किमी अंतरावर स्थित, पुरीचा समुद्रकिनारा सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे पाहण्याचा अनोखा नजारा येथे संधी मिळते.

वरकला बीच

वरकला बीच (केरळ)

केरळची राजधानी त्रिवेंद्रमच्या उत्तरेला वरला समुद्रकिनारा असून हे बीच योग आणि आयुर्वेदासाठी प्रसिध्द आहे. येथे आराम आणि ताजेतवाने होण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. एका बाजूला सुंदर उंच ताड वृक्ष आणि दुसरीकडे अरबी समुद्राचे दृश्य मन आपणास दिसते.

गोकर्ण बीच

गोकर्ण (कर्नाटक)

गोकर्ण हे उत्तर कर्नाटकातील एक छोटे शहर असून भारतातील चार सर्वात निर्जन किनारे येथे आहेत. येथे मोठ्या संख्येने यात्रेकरू आणि प्रवासी भेट देत असतात. पूर्वीचे गोव्याचे बिच प्रमाणे येथील बिच दिसतात.

पालोलेम बीच

पालोलेम (दक्षिण गोवा)

दक्षिण गोवामध्ये पालोलेम हा सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो. हा एक मैल लांब, अर्धवर्तुळाकार समुद्रकिनारा आहे ज्याभोवती नारळाच्या झाडांचे घनदाट जंगल आहे. दरवर्षी या किनाऱ्यावर भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.

पुडुचेरी बीच

पुडुचेरी बीच

पूर्व भारतातील तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पुडुचेरी हे उत्तम ठिकाण आहे. ऐतिहासिक फ्रेंच क्वार्टर हे शहरातील हॉटस्पॉट आहे, तर जवळील ऑरोविले आणि पॅराडाइज बीच पोहण्यासाठी उत्तम ठिकाण आहेत.

तारकरली बीच

तारकरली बीच (महाराष्ट्र)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तारकर्ली हे बीच मालवणच्या दक्षिणेस 8 किमी आणि मुंबईपासून सुमारे 546 किमी अंतरावर आहे. हे सुंदर बीच असून येथे भरपूर रिसॉर्ट आहे. येथून शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध नौदल किल्ला सिंधुदुर्ग तुम्ही पाहू शकतात.

राधानगर बीच

राधानगर बीच

आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक हा समुद्रकिनारा असल्याचे बोलले जाते. हा समुद्र किनारा हॅवलॉक बेटावर स्थित असून जो बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. राधानगर बीच शांत वातावरण, शांत पाणी आणि बारीक पांढरी वाळू यासाठी प्रसिद्ध आहे.

चंडीपुर बीच

चंडीपुर बीच (ओडिशा)

ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस साडेचार तासावर चंडीपुर बीच बालासोर जिल्ह्यात आहे. हे अदृश्य होणाऱ्या समुद्रासाठी ओळखले जाते. एवढेच नाही तर ते सर्वात असामान्य बीच म्हणून देखील सूचीबद्ध आहे. यासह, आपण ओडिशाची अधिक चांगली आकर्षणे शोधू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT