monsoon-palace-udaipur
monsoon-palace-udaipur monsoon-palace-udaipur
टूरिझम

पावसाळ्याच्या सुंदर वातावरणात मॉन्सून पॅलेस पाहण्याची मजा काही वेगळीच

सकाळ डिजिटल टीम

प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत असे काही राजवाडे, किल्ले आणि वाडे भारतात बांधले गेले होते; जे आजही जगप्रसिद्ध आहेत. मध्ययुगीन काळात बांधलेल्या राजवाड्यांबद्दल किंवा राजवाड्याचा (palace in udaipur) उल्लेख येतो, तेव्हा राजस्थानचे नाव नक्कीच घेतले जाते. या राज्यातील उत्कृष्ट आणि जगातील प्रसिद्ध राजवाडे अजूनही लाखो पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करीत आहेत. असे अनेक राजवाडे आहेत जे युनेस्को हेरिटेजमध्ये समाविष्ट आहेत. राजस्थानातील उदयपूरमध्ये असाच एक वाडा आहे; जो पर्यटकांसाठी अजूनही एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. आम्ही "मॉन्सून पॅलेस'बद्दल (monsoon palace udaipur) सांगत आहोत. या वाड्याविषयी जे काही नमूद केले आहे, ते कमी आहे. (tourism-news-know-the-history-of-monsoon-palace-udaipur)

राजवाड्याचा इतिहास

मॉन्सून पॅलेस हा सज्जनगड पॅलेस (udaipur to sajjangarh) म्हणूनही ओळखला जातो. मुख्य शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मॉन्सून पॅलेस निर्माण कार्याची सुरुवात सज्जनसिंग यांनी केली होती. पण, कालांतराने सज्जनसिंग यांचा मृत्यू झाला आणि राजवाड्याचे काम थांबले. त्यानंतर महाराणा फतेहसिंग यांनी 1884 च्या सुमारास या वाड्याच्या कामास पुन्हा सुरवात केली. सुमारे दहा वर्षांनंतर हा राजवाडा पूर्ण झाला. (history of monsoon palace)

पॅलेस आर्किटेक्‍चर

आश्‍चर्यकारक राजवाडा पाहणे हे देखील पर्यटकांचे एक प्रमुख केंद्र असू शकते. हा वाडा संगमरवरी दगडांनी बांधला आहे. या राजवाड्यात मुघल स्थापत्य (sajjangarh palace udaipur) वास्तू कलेपासून ते मेवाडी पोर्ट्रेट शैली सहज दिसते. या महालाच्या आत बरीच उद्यानेही अस्तित्वात आहेत, जे त्यास आणखी विशेष बनवतात. या राजवाड्याच्या छतावर एक तोफ देखील आहे, जी सहज दिसते. (history of monsoon palace udaipur)

इतर माहिती आणि तिकीट

असं म्हणतात, की पावसाळ्याच्या काळात अरवलीच्या रमणीय आणि उंच पर्वतांनी आणि ढगांनी वेढलेला हा वाडा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. या वाड्याजवळील तलाव देखील अधिक सुंदर आहे. तिकिटाविषयी सांगायचे झाले तर, तर भारतीय पर्यटकांसाठी तिकिटाची किंमत दहा रुपयांच्या आसपास आहे आणि (monsoon palace entry fee) परदेशी पर्यटकांसाठी 1550 रुपये आहे. इथं फिरण्यासाठी मॉन्सून ही चांगली वेळ मानली जाते.

राजवाडा बांधण्यामागची कथा

राजवाड्याच्या बांधकामाविषयी जाणून घेतल्यानंतर पावसाळ्यात इथे नक्कीच भेट द्यायला हवी. राजवाडा बनवण्याच्या मागे एक कथा दडली आहे. असे म्हणतात, की हा राजवाडा अशा ठिकाणी बांधला गेला होता, जिथून महाराणा फतेहसिंगचा राजवाडा म्हणजेच चित्तोडचा किल्ला दिसतो. दुसरे कारण असे की, पॅलेस अशा ठिकाणी आणि उंच ठिकाणी बांधले पाहिजे जिथून ढग पाहता येतील आणि उदयपूरच्या हवामानाचा पुरेपूर आनंद लुटता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT