Monsoon Travel esakl
टूरिझम

Monsoon Travel : पावसाळ्यात भटकंतीला जाताय? मग, 'ही' खबरदारी नक्की घ्या.!

Monsoon Travel : निसर्ग सौंदर्य पाहताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Travel : मॉन्सूनच्या आगमनानंतर सध्या सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यामध्ये भटंकतीचे प्रमाण वाढले आहे. निसर्गप्रेमी जिल्ह्याच्या विविध गड-किल्ल्यावर आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र, हे निसर्ग सौंदर्य पाहताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने करण्यात आले.

पावसाळा आला की, मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी दैनंदिन कामाच्या ताणातून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी सुट्यांमध्ये हजारो नागरिक ट्रेकिंग किंवा भटकंतीसाठी डोंगर, घाटमाथ्यावर किंवा गड-किल्ल्यावर पोहचतात. मात्र, भटकंतीच्या अतिउत्साहामुळे व अतिधाडसामुळे दरवर्षी अनेकांचा जीवदेखील जातो. ही बाब लक्षात घेऊन भटकंतीला जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

रिल्स अन् व्हिडिओमुळे गर्दी...

समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट व्हिडिओमुळे भटकंतीचा ट्रेंड वाढला आहे. समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट अपलोड करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातो. मात्र दरड, अपघात किंवा पाण्यात बुडाल्यावर अशा लोकांना वेळेत मदत मिळत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी काही सूचना गिरीप्रेमी संस्थेतर्फे नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षित ट्रेकिंगसाठी पर्याय...

  • चंदनवंदन किल्ला

  • वैराटगड

  • संतोशगड

  • वारुगड

  • चावंड

  • धोक्याची ठिकाणे...

  • कुंडलिका व्हॅली

  • अलंग मदन कुलंग किल्ला

  • कलावंतीण दुर्ग

  • हरिश्र्चंद्र गड

  • हरिहर किल्ला

पावसाळ्यात सह्याद्रीतील भटकंती जरूर केली पाहिजे. कारण या ऋतूमध्ये सह्याद्रीच रूप हे अत्यंत मनमोहक असते. परंतु, पावसाळी भटकंती अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणाऱ्या दरडी, धुके, धबधबे, ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. या ऋतूमध्ये मानवी चुकांमुळे मृत्यू होतो. अतिसाहस किंवा अतिरेक न करता सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल.

- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

काय काळजी घ्याल?

  • ओळखीच्या व अनुभवी

  • ग्रुपसोबत ट्रेकला जावे

  • ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल, एवढीच असावी

  • ग्रुपकडे प्रथमोपचाराचे साहित्य असावे

  • ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर, ग्रुप यांची माहिती जवळच्या व्यक्तीस द्यावी

  • सोबत चांगली टॉर्च ठेवावी

  • पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे

  • धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी

  • सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे

हे करणे टाळा...

  • किल्ल्यावरील तट, दरवाजे, इतर पडीक

  • अवशेष यांवर चढू नये

  • अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे

  • पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये

  • शक्यतो एकट्याने भटकंती किंवा

  • ट्रेकिंगचे नियोजन टाळावे

  • दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

SCROLL FOR NEXT