Nirmala Sitharaman On 5G mobile services Sakal
Union Budget Updates

घरोघरी 5G सेवेचा संकल्प; अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा

सुशांत जाधव

Union Budget 2022, Nirmala Sitharaman On 5G mobile services : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी 5G मोबाईल सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली. 2023 पर्यंत देशातील प्रत्येक घरात 5 G सेवा पुरवण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

5 G सेवा भक्कम करण्यासाठी इकोस्टिस्टिमची (Ecosystem) उभारणी करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात फायबर केबल्सच्या माध्यमातून 5 G सेवेचं जाळे विणण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील छोट्या छोट्या खेड्यांनाही (Remote Area) ही सेवा उपलब्ध होईल याचा सरकारने विचार केला आहे, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संसदेत चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला निर्मला सितारामन यांनी 5 G सेवेची प्रतिक्षा करणाऱ्यांना दिलासा दिला. 2023 पासून देशात 5 G नेटवर्क सुविधा सुरु केली जाईल, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 5 G लॉन्चिंगसाठी योजना आणली जाईल. 2025 पर्यंत ही सुविधा देशातील खेडोपाड्यात पोहचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT