Union Budget 2026 Updates

Union Budget 2024: "घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन..."; खासदार अमोल कोल्हेंच्या ट्विटची चर्चा

केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर टीका करताना विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका करताना ट्वीट केलं आहे. पण या ट्विटची सध्या चर्चा रंगली आहे.

अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणं बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठं पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं. पण यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीच आलेलं नाही. यावरुनच अमोल कोल्हे यांनी वेगळ्या पद्धतीनं नेमक्या शब्दांत यावर भाष्य केलं आहे. गणेशाच्या आरतीच्या स्वरुपात त्यांनी आपलं म्हणणं शब्दबद्ध केलं आहे.

अमोल कोल्हेंनी काय ट्विट केलंय?

कोल्हे म्हणतात...

आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश :

घालीन लोटांगण वंदीन बिहार,

डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,

दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,

सरकार वाचवेन म्हणे नमो !!

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच केंद्र सरकार सध्या सत्तेत आहे. यापार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेल्या पॅकेजबाबत भाष्य केलं आहे. म्हणजेच बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेलं पॅकेज आणि महाराष्ट्राकडं केलेलं दुर्लक्ष यामध्ये राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

SC-ST-OBC आरक्षणात नवा उप-कोटा? सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मांडली भूमिका, आय आधारित उप-कोट्याला विरोध

School Stabbing Incident: देवगाव रंगारीत शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने हल्ला; चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Nashik Village Water Crisis: खाजगी जमिनीच्या वादामुळे दसाने गावाचा पाणीपुरवठा ठप्प; संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला कुलूप

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची भरती! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३,३५१, तर खासगी शाळांमधील १२,१४८ पदे; १९ हजार ८८१ शिक्षकांना मिळणार थेट नियुक्ती

SCROLL FOR NEXT