Budget 2023  Sakal
Union Budget Updates

Budget 2023 : अर्थमंत्री सारखं म्हणतात ते 'अमृत काल' म्हंजे काय रं भौ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना वारंवार अमृत काल असा उल्लेख केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

"अमृत काळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. मागच्या अर्थसंकल्पनाने घालून दिलेला पाया भक्कम करण्याची आणि इंडिया अॅट १०० ची ब्लूप्रिंट सत्यात आणण्याची आशा या अर्थसंकल्पाकडून आहे. विकासाची फळं सगळ्यांना चाखायला मिळतील, अशा सर्वसमावेशक भारताकडे आम्ही वाटचाल करत आहोत", असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या.

निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी आपल्या भाषणामध्ये त्यांनी वारंवार 'अमृत काल' असा उल्लेख केला. या अर्थसंकल्पाने महिला, तरुण आणि वंचितांसाठी भविष्यवेधी अमृत काळ आणला आहे, असंही सीतारामन म्हणाल्या.

हा अमृत काल म्हणजे नक्की काय?

२०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काल ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना मोदींनी हा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी देशासाठी पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप मांडत असताना अमृत काल असा उल्लेख केला होता.

भारतीयांचं जीवनमान सुधारणं आणि गाव व शहरातली विकासाची दरी कमी करणं हे अमृत काळाचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक आयुष्यामध्ये सरकारचा अडथळा कमी करणं आणि आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटायझेशनची वाट धरणं हेही या अमृत काळाचं उद्देश आहे.

अमृत काळ या शब्दाचं मूळ वेदांमध्ये आढळून येतं. अमृत काळ हा कोणतंही नवं काम सुरू कऱण्यासाठी सर्वोत्तम आणि मंगल काळ असल्याचं मानलं गेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT