Jain community members and women devotees participating in the Mahavir Swami Nirvana festival organized by the Digambar Jain Samaj here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : महावीर स्वामी निर्वाण महोत्सवानिमित्त 75 किलोचा लाडू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे महावीर स्वामी यांच्या २५५० वा निर्वाण महोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.(75 kg Laddu on occasion of Mahavir Swami Nirvana Festival nandurbar news)

शहरातील माणिक चौक परिसरात असलेल्या दिगंबर जैन समाजाच्या सर्व सिद्धीदायक १००८ अजितनाथ दिगंबर जैन मंदिरात कार्तिक अमावस्या निमित्त सोमवारी विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.

यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षकालनिमित्त ७५ किलोच्या लाडूचा प्रसाद महावीर भगवान चरणी अर्पण करण्यात आला.लाडूचा महाप्रसाद बनविण्यासाठी महिला मंडळाचे अमूल्य योगदान ठरले.

डीजे आणि इतर वाद्य पर्यावरणाला पूरक नसून पारंपारिक पद्धतीने सनई वादन लावून धार्मिक उपक्रम घेण्यात आले.अशी माहिती दिगंबर जैन समाजप्रमुख आणि दिगंबर जैन समाज महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली.

याप्रसंगी कार्यक्रमास आबाल वृद्धांसह युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर जैन समाज आणि महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. विजय अजमेरा यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT