Balasaheb Sanap 
उत्तर महाराष्ट्र

निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग; नाशिकमध्ये धक्का

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरुच असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले आहे.

बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रचारादरम्यान सेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या भेटीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हाती दमदार नेता लागल्याचे सांगण्यात येत असून, याचा नाशिक महापालिका राजकारणावर परिणाम होणार आहे.

बाळासाहेब सानप यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले. निवडणुकीपूर्वी भाजप सोडून सानप राष्ट्रवादीत गेले होते. राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवत होते. सानप यांना हाताशी धरून पालिका काबीज करायची होती छगन भुजबळ यांची योजना पण तसे होताना आता  दिसत नाही. आता सानप शिवसेनेत गेल्याने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT