Balasaheb Sanap 
उत्तर महाराष्ट्र

निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग; नाशिकमध्ये धक्का

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरुच असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले आहे.

बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रचारादरम्यान सेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या भेटीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हाती दमदार नेता लागल्याचे सांगण्यात येत असून, याचा नाशिक महापालिका राजकारणावर परिणाम होणार आहे.

बाळासाहेब सानप यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले. निवडणुकीपूर्वी भाजप सोडून सानप राष्ट्रवादीत गेले होते. राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवत होते. सानप यांना हाताशी धरून पालिका काबीज करायची होती छगन भुजबळ यांची योजना पण तसे होताना आता  दिसत नाही. आता सानप शिवसेनेत गेल्याने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavanraje Nimbalkar : माफीचा साक्षीदार कोण, ज्याच्यामुळे बदलला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल

Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO साठी Jio चा सेबीकडे अर्ज! Meta-Googleचाही विश्वास; अंबानींचा मास्टरप्लॅन काय?

एंट्री होणार तितक्यात माझ्या पायजम्याची नाडी तुटली... मग काय केलं? अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा

IND vs AFG: रोहित शर्माची हॅटट्रिक! बॉलर प्रसिद्ध अन् फिल्डर हिटमॅनचे अफलातून झेल... अफगाणिस्तानला धक्क्यांमागून धक्के Video

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

SCROLL FOR NEXT