नाशिक - ‘सकाळ- ॲग्रोवन’ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेत रविवारी प्रदर्शनात फळांविषयी माहिती जाणून घेताना शेतकरी. 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी संपन्न करण्याचा निर्धार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासोबतच शेतकरी सुखी व संपन्न करण्याचा निर्धार करीत दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेची रविवारी (ता.६) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सांगता झाली. 

"अन्नसुरक्षेच्या माध्यमातून फलोत्पादन'' हे घोषवाक्‍य असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यातर्फे दुसरी राष्ट्रीय राष्ट्रीय फलोत्पादन परिषद झाली. या परिषदेत काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व अन्नसुरक्षा या विषयांवर चार सत्रांमधून देशभरातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी व प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचारमंथन केले. राज्यभरातून निमंत्रित केलेल्या बाराशे शेतकऱ्यांनी या परिषदेत वक्‍त्यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिषदेच्या समारोपप्रसंगी शेतकरी, अधिकारी व तज्ज्ञांनी एकत्रितपणे तयार केलेला जाहीरनामा वाचून दाखविण्यात आला. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी जाहीरनाम्याचे 
वाचन केले. समारोपप्रसंगी ‘आत्मा’चे नाशिक येथील प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे, कृषी अधिकारी गोविंद हांडे, जयंत देसाई, हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

महापरिषदेचा जाहीरनामा
फलोत्पादनातील सर्व उत्पादक, बागायतदार शेतकऱ्यांनी फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने भारतीय; तसेच विदेशातील ग्राहक ते सरकारी व प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित घटकांना उद्देशून जाहीरनामा जाहीर केला.
मानवीय दृष्टिकोनातून सुरक्षित व जागतिक बाजारपेठेच्या निकषानुसार विषमुक्त उत्पादन घेऊ. 
शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविणे, शेतकरी सुखी व संपन्न करणे हे ध्येय. 
एकमेकांच्या हातात हात घालून समृद्ध बनविण्यानाचा सामूहिक निर्धार.

‘साम’वर आज ‘आवाज महाराष्ट्राचा’
‘सकाळ - ॲग्रोवन’ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक येथे दोन दिवस झालेल्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेच्या समारोपावर आधारित ‘आवाज महाराष्ट्राचा’ हा विशेष कार्यक्रम उद्या (ता. ७) रात्री आठ ते नऊ यावेळेत ‘साम’ मराठी वाहिनीवरून प्रसारित होईल. तसेच, या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण मंगळवारी (ता. ८) सकाळी दहा ते अकरा या वेळेत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT