Yuva Sena (Ubatha) office bearers, students protesting at Uttar Maharashtra University, poetess Bahinabai Choudhary, for the demand of paper examination of various faculties, stop the question of fee collection. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: पेपर तपासणीत गलथान कारभार कायम! युवासेनेसह विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यापीठावर मोर्चा, कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन

Dhule News : विद्यार्थ्यांच्या तक्रारी उपकुलगुरूंकडे मांडल्या व परीक्षेच्या निकालात होणारा गोंधळ सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून घेतलेल्या विविध विद्याशाखांच्या निकालात यंदाही गलथान कारभार कायम राहिला, असा आरोप करत युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विद्यार्थ्यांसह जळगाव येथे विद्यापीठावर मोर्चा नेला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी उपकुलगुरूंकडे मांडल्या व परीक्षेच्या निकालात होणारा गोंधळ सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. (Dhule Mistakes in paper inspection continue Accusation of students Yuva Sena)

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून दर वर्षी परीक्षांच्या निकालात परीक्षा विभागाचा गलथान कारभार वारंवार समोर येतो. यंदाही तो कायम राहिला. याबाबत विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्याचे युवासेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी म्हटले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर न तपासता गुण दिल्याचा धक्कादायक प्रकारदेखील समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना प्रत्येक उत्तराला सरासरी सारखेच गुण देऊन पेपर तपासणी झाल्याचाही प्रकार आहे. यासोबतच ज्या विषयाचा पेपर तपासला जाणार आहे त्याऐवजी दुसऱ्या विषयाच्या पेपरचे नाव त्या उत्तरपत्रिकेवर टाकून तो तपासून निकाल दिल्याचा प्रकारही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्याचे ॲड. गोरे यांनी म्हटले आहे.

ज्या विषयात उत्तीर्ण होण्याचा विद्यार्थ्यांना विश्‍वास आहे, त्याच विषयात त्यांना नापास केले जाते. चॅलेंज केल्यानंतर ते विद्यार्थी उत्तीर्ण होऊनदेखील त्यांना भरलेले शुल्क परत केले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कुठलीही कारवाई विद्यापीठाकडून केली जात नाही.

शुल्क अन्यायकारक

सोबतच एमबीएच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी ५१० रुपये शुल्क आकारले जात असून, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्यासाठी एक हजार रुपये विद्यापीठाकडून शुल्क घेतले जात आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना २४० रुपये फोटोकॉपीसाठी, ५०६ रुपये चॅलेंज करण्यासाठी, तर व्हेरिफिकेशनसाठी ११० रुपये मोजावे लागत आहेत. विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे हे शुल्क पाहता हे विद्यापीठ आहे की उद्योगपीठ, असा सवाल युवासेनेने केला. (latest marathi news)

बीएस्सी विद्यार्थ्यांचा प्रश्‍न

बीएस्सी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन किंवा ८+ विषयांची एटीकेटी करावी. यंदा एसवीय बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना सरासरी सात ते आठ विषयांत नापास करण्यात आले आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना सर्व विषयांना चॅलेंज करायचे असूनदेखील विद्यापीठाच्या चुकीच्या अटींमुळे ते करता येत नाही.

कारण दोन विषयांनाच चॅलेंज करण्याची अट विद्यापीठाने टाकून ठेवली आहे. त्यासाठी हजारो रुपये फी आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालविली आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योग्य निर्णय घेऊन त्यांना कॅरीऑन किंवा ८+ विषयांची एटीकेटी लागू करावी, अशी मागणीही युवासेनेने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT