Water Shortage
Water Shortage 
उत्तर महाराष्ट्र

दर गुरुवारी आता ‘ड्राय डे’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - गेले दोन दिवस शहर व परिसरात मुसळधार झाली असली, तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने अखेरीस पाणीकपातीबरोबरच आता महापालिका प्रशासनाने आठ दिवसांतून एकदा दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे रोजचे ५० ते ६० दशलक्ष लिटर व आठ दिवसांतून एकदा ४६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जाणार आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही तोपर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल.

गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याचा परिणाम यंदा पावसाळा सुरू झाला तरी जाणवत आहे. गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने गंगापूर धरणातील पाण्याची पाहणी केली. त्या वेळी इन्टेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी पोचल्याचे निदर्शनास आले. इन्टेक वेलपर्यंत पाणी आणण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू करण्यात आले.

पावसाला सुरवात झाली असली, तरी निरंतर पाऊस राहील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे गंगापूर धरणातील सद्यःस्थितीतील पाणी वाचविणे गरजेचे असल्याचा अहवाल प्रशासनाकडून महापौर रंजना भानसी यांना सादर करण्यात आला. त्या वेळी पाणीकपात गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार महापौर भानसी यांनी जेथे दिवसातून दोनदा पाणी येते, तेथे एकवेळत पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. कपातीच्या माध्यमातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जात आहे.

असमाधानकारक पाणीसाठा
एकवेळ पाणीकपात केल्यानंतर प्रशासनाने दोन दिवस पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी (ता. २) त्या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला. धरणातील पाणीपातळी अद्याप समाधानकारक नसल्याने आठ दिवसांतून एकदा म्हणजे, दर गुरुवारी संपूर्ण दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवार(ता. ४)पासून हा निर्णय अंमलात येईल. नवीन कपातीतून ४६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT