Unseasonal Rain esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Unseasonal Rain : पावसाच्या शिडकाव्याने जिल्हा गारठला; कापसाला फटका बसण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Unseasonal Rain : जिल्ह्यात रविवारी (ता. २६) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर काहीसे आकाश मोकळे झाले, मात्र अकरानंतर पुन्हा वातावरणात गारठा निर्माण होऊन दुपारी बाराला ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी सुरू झाल्या.

त्यानंतर दिवसभर पावसाचा शिडकावा अधूनमधून सुरू होता. त्यामुळे दिवसभर गारठामय वातावरण होते. (Fear of cotton being hit due to unseasonal rain in district nandurbar news)

शनिवारपासून काहीसे ऊन-सावलीचे वातावरण जाणवत होते. मात्र रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यकिरणांचे दर्शन झाले नाही. त्यानंतर गारठामय वातावरण निर्माण झाले. सकाळी अकराला पाऊस भरून आल्यासारखे वातावरण व दुपारी बाराच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली.

आज रविवारचा दिवस असल्याने बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. शासकीय कार्यालयांनाही सुटी असल्याने नोकरदारांनी घरातच राहणे पसंद केले. मात्र शेतकरी व मिरची उत्पादक आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. मिरची पथारी मालकांची खूपच धांदल उडाली. वाळविण्यासाठी टाकलेली मिरची वाचविण्यासाठी मजुरांकडून तिच्यावर पाल व प्लॅस्टिक कागद झाकण्यात आले.

पाऊस जोराचा नसला तरी त्याचे काहीही खरे नाही. अवकाळी म्हणजे नुकसानकारक असतो, म्हणून व्यापाऱ्यांनी काळजी घेतली. कापूस उत्पादकांनाही त्याचा फटका बसला. ज्यांच्या शेतात कापूस काढणीस आला आहे त्यांचा कापूस ओला झाला. उद्या ऊन न पडल्यास तो काळा-पिवळा पडू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

तसेच मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. रविवारी मिरची तोडणी करून सोमवारी बाजार समितीत आणली जाते. त्यामुळे अनेकांनी आज मिरची तोडणीचे काम सुरू केले होते. मात्र पावसाच्या शिडकाव्यामुळे ते थांबवावे लागले. बाजार समितीत धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचीही धावपळ उडाली होती.

नवापूर तालुक्यास गारांनी झोडपले

नवापूर : शहरासह तालुक्यात रविवारी बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी गारांसह पाऊस पडला. हिवाळ्यात पावसाळा आल्याने हिवाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे नुकसान झाले. या पावसामुळे सर्वच क्षेत्रांत नुकसान झाले.

सकाळपासून थंडगार वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसभराच्या पावसाने हैराण झालेले नागरिक, शेतकरी सायंकाळी पावणेसातला गारांसह पाऊस आल्याने अधिकच चिंतातुर झाले. सायंकाळी गारांनी अक्षरशः झोडपले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी कमी होत गेली होती. रविवारी सकाळी पावसाळी वातावरण तयार झाले होते. सकाळी अकराला पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतमाल आवराआवर करण्यात झुंबड उडाली, तर व्यापारी वर्गातही दुकानाबाहेर विक्रीसाठी लावलेला माल आवरण्यासाठी पळापळ झाली.

शेतकऱ्यांनी हातात आलेली पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले, काही शेतकरी बाजारपेठेच्या गावी जाऊन प्लॅस्टिक कापड घेऊन आले. रविवार असल्याने सर्व शासकीय कार्यालये बंद असल्याने नागरिकांची गर्दी नव्हती. मात्र मंगळवारी माध्यमिक शाळा सुरू होत असल्याने आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री घेण्यासाठी पालकांची गर्द दिसून आली. पावसासोबत थंडीचा ही जोर वाढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : माजी खासदार सुजय विखेंचे बॅनर फाडल्याप्रकरणी फिर्यादी निघाला आरोपी

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT