gram-panchaya
gram-panchaya 
उत्तर महाराष्ट्र

बापरे! घरातून एक सदस्य एकदा तरी सरपंच व्हावा म्हणून लावली ४२ लाखांची बोली; गावाची सर्वत्र चर्चा

भूषण श्रीखंडे

नंदूरबार ः  राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या निवडणूकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे दररोज काहीना काही राजकीय घडामोडी घडत आहे. असेच काही नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी गावात संरपंच पदासाठी ४२ लाखाची बोली लागल्याने राज्यात या गावाची एकच चर्चा सद्या सुरू आहे. 

आवश्य वाचा- धुळे महापालिकेला स्कॉच ॲवॉर्ड; भुयारी गटार स्वच्छतेसाठी रोबोटिक मशिनचा वापर -

नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी हे पाच हजार नागरी वस्तीचे गाव असून गावातील वाघेश्वरी देवीवर गावकऱ्यांची मोठी श्रध्दा आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा गावातील खोंडामळी मंदीर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल त्याची वर्णी संरपंच पदासाठी लागेल असे ठरविण्यात आले. ठरल्यानुसार लिलावाची बोली लागली आणि राज्यात एकच चर्चा सुरू झाली. 

लिलावात ४२ लाखाची बोली...
सरंपच पदासाठी मंदिराला देणगी देण्यासाठी बोली सुरू झाल्यावर काहींनी साधारण २५ लाख ते ३८ लाखापर्यंत बोली काहींनी लावली. पण सर्वात जास्त प्रदीप वना पाटील यांनी ४२ लाखाची बोली लावणी आणि ही बोली अंतिम ठरली. 

घरातून एकदा तरी सरपंच व्हावा...
प्रदीप वना पाटील यांच्या घरातील एक सदस्य तरी संरपंच व्हावा असा मानस होता. त्यानुसार देविवरील श्रध्दा आणि मनात असलेल्या मानस नुसार सरपंच पदासाठी प्रदीप पाटील यांनी लिलावात ४२ लाखाची बोली लावून पाच वर्षासाठी ग्रापमपंचायतीचा सरपंच होण्याचा मानस पूर्ण केला. त्याना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी प्रोत्साहीत केल्याची माहिती समोर येत आहे. 

पण प्रदीप पाटील पात्र नाही
प्रदीप पाटील यांनी सरपंच पदासाठी ते पात्र नसून त्यांना चार अपत्य आहे. ते व त्यांच्या पत्नीसा सरंपच होता येणार नाही. पाटील यांनी मंदिर उभारणीसाठी सर्वात जास्त बोली लावलेली असल्याने त्यांच्या घरातील एक व्यक्ती सदस्य होता येईल तसेच ते सांगतिल तेच सदस्य ग्रामपंचातमध्ये बिनवीरोध निवड त्यांची होणार आहे. त्यामुळे प्रदीप पाटील यांच्या मुलीची सरपंच पदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सद्या गावात सुरू आहे. 

सरपंच पदाची बोलीची सर्वत्र चर्चा
राज्यात सरपंच पदासाठी बोली लावाणे आणि ४२ लाखाची एवढी मोठी बोली एका पदासाठी लागणे अशी घटना पहिलीच असल्याचे सांगितली जात आहे. त्यामुळे राज्यभर या सरपंच पदाच्या बोलीची एकच चर्चा आहे.  


राजकीय घडामोडीची शक्यता 
बोली लावून सरपंचपद दिले जात असल्यावर गावातील काही नागरिकांनी यावर आक्षेप नोंदवीला आहे. गावाच्या विकासासाठी व एकोपा रहावा यासाठी लवकरच हा विरोध मावळेल असे वाटत असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT