उत्तर महाराष्ट्र

खरेदी बंद झाल्याने पाच हजार क्विंटल उडीद पडून

सकाळवृत्तसेवा

जळगाव - अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असताना शासनाने नाफेडमार्फत सुरू केलेली उडीद खरेदी मुदतीआधीच बंद केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अजूनही जिल्ह्यात पाच-सहा हजार क्विंटल उडीद खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे उडीद खरेदीसाठी दोन दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाने केली आहे. 

गेल्या दोन वर्षांतील डाळींचे चढते भाव लक्षात घेता गेल्या खरीप हंगामात तूर व उडीद लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला. जळगाव जिल्ह्यात तुलनेने उडदाची लागवड कमी झाली व पावसानेही दगा दिल्यामुळे एकूणच खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कपाशी, मका, सोयाबीनसह कडधान्याच्या उत्पादनालाही त्याचा फटका बसला. उडीद उत्पादनही घटले आणि बाजारपेठेत उडदाचे भाव कोसळले. त्यामुळे शासकीय नाफेडच्या खरेदी केंद्रावरच उडीद उत्पादक शेतकऱ्यांची मदार होती. 

पाच हजार क्विंटल माल पडून
दरम्यान, दोन-तीन दिवस आधीच उडीद खरेदी बंद केल्याने हा उडीद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्यामुळे केंद्र दोन दिवसासाठी सुरू करावे, सर्व शेतकऱ्यांकडील उडदाची नोंदणी करून खरेदी करावी, अशी मागणी असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाने मार्केटिंग फेडरेशनकडे केली आहे. या निवेदनावर किशोर चौधरी, मिलिंद चौधरी, मनोहर महाजन, प्रभाकर चिरमाडे, जितेंद्र भोळे, संजय ढाके, संदीप नारखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेक्‍टरी सहा क्विंटलच खरेदी
उडीद खरेदीलाही शासनाने मर्यादा घालून दिली आहे. शासनाकडून हेक्‍टरी केवळ सहा क्विंटलच उडीद खरेदी केला जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचा त्यापेक्षा जास्त उत्पन्न झालेला उडीद खरेदी करण्यात आला नाही, अशाही तक्रारी समोर येत आहेत. जळगावच्या केंद्रावर जळगावसह एरंडोल, धरणगाव, जामनेर, यावल, भुसावळ, चोपडा आदी तालुक्‍यांमधून उडीद विक्रीसाठी येतो. या ठिकाणांहून १० डिसेंबरपर्यंत सुमारे सात-आठ हजार क्विंटल उडदाची खरेदी जळगाव केंद्रावर झाली. मात्र, अजूनही पाच ते सहा हजार क्विंटल उडीद शेतकऱ्यांकडे पडून आहे.

मुदतीआधीच केंद्र बंद
उडीद खरेदीसाठी नाफेडने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव केंद्र सुरू केले. बाजारात तीन-साडेतीन हजार रुपये भाव असताना नाफेडतर्फे ५ हजार ४०० रुपये भाव दिला जात असल्याने स्वाभाविकच शेतकऱ्यांनी या केंद्रावर उडीद विक्रीसाठी आणण्यावर भर दिला. मार्केटिंग फेडरेशनने याआधी जाहीर केलेल्या मुदतीनुसार १३ डिसेंबरपर्यंत उडीद केंद्रांवर आणण्याची मुदत होती. त्यामुळे १३ तारखेपर्यंत मालाची नोंदणी करून विक्री करता येईल, या भरवशावर शेतकरी राहिले. मात्र, प्रत्यक्षात ११ डिसेंबरलाच हे केंद्र दुपारपासून बंद करण्यात आले, शिवाय नोंदणीही बंद असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT