cilantro 
उत्तर महाराष्ट्र

दोनशे पार गेलेल्‍या कोथिंबिरीचे भाव आता ऐकून बसेल धक्‍‍का; मार्केटमध्ये जावून शेतकऱ्यालाही धक्‍का

अशफाक खाटीक

न्याहळोद (धुळे) : कोथिंबिरीचे भाव पडल्याने शेतकरी संकटात सापडला असून, कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्चही कोथिंबीर विकून निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असतानाच पिकविलेल्या शेतमालालाही आता भाव मिळत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. 
न्याहळोद येथील शेतकरी यशवंत माळी यांनी त्यांच्या शेतात कोथिंबीर लावली होती. कोथिंबिरीची देखरेख, मशागत करून त्यांना भरघोस उत्पादन आल्याने त्यांना कोथिंबीर विकून दोन पैसे हातात येतील व घेतलेले कर्जही फेडता येईल, अशी आशा होती. यामुळे त्यांनी १६ मजूर ६० रुपयांप्रमाणे कोथिंबीर काढण्यासाठी लावले. काढलेली कोथिंबीर गोळा करण्यासाठी शंभर रुपये रोजंदारीने शेतमजूर लावला. त्यानंतर गोळा केलेली कोथिंबीर धुळे येथे मार्केट कमिटीत विकण्यासाठी आणली. यासाठी त्यांना गाडीभाडे पाचशे रुपये द्यावे लागले. असा सर्व मिळून खर्च त्यांना एक हजार ५६० रुपये आला. मात्र जेव्हा कोथिंबिरीची विक्री झाली तेव्हा केवळ एक हजार ८५ रुपये मिळाले. त्यातही हमाली व तोलाई वजा जाता हातात फक्त नऊशे रुपये आले. 

साडेसहाशे रूपयांची तूट
खर्च एक हजार ५६० व उत्पन्न केवळ ९०० रुपये येऊन तब्बल ६६० रुपयांची तूट आली. यात दोन महिन्यांचे राबणे जोडलेले नाही. अशाच प्रकारे जर शेतीचे गणित तुटीचे असेल तर शेतकरी बांधवाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकरी जेव्हा शेतमाल पिकवितो तेव्हा योग्य दरात शेतमाल विकला जात नाही. अशातच सक्तीची वीजबिल वसुली, कर्जवसुलीसाठी शेतकरी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना ‘खायापिया कुछ नहीं ग्लास फोडा बारा आणा’ असे म्हणायची वेळ आली आहे. 
 
संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT