Wheat, larvae on trumpet 
उत्तर महाराष्ट्र

गहू, तुरीवर अळी..मग या फवारण्या आवश्‍यक; धुके व पावसाचा परिणाम

विनोद सूर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : शहरासह तालुक्यात मागील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाची कमी म्हणून की काय आता धुक्याने तालुका व्यापला आहे. अधून- मधून पाऊस, ढगाळ वातावरण व धुक्यामुळे रब्बी पिकांवर मुख्यत्वे गहू, तूर आणि हरभरा पिकांवर विपरित परिणाम होत आहे. थंडी देखील येते आणि पुन्हा गायब होते अशा बदलत्या हवामानामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 
पाऊस झाल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला. मागील आठवड्यात थंडी जाणवू लागली होती. दिवसभर उन्हाचे चटके बसतात तर सायंकाळपासून झोंबणारी थंडी वाढते. दोन- तीन दिवस वातावरणात हिवाळा जाणवतो; तर मध्येच अचानक थंडी गायब होते आणि उष्मा जाणवू लागतो. ढगाळ वातावणामुळे देखील थंडी गायब होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मागील रविवारी थंडीच्या वातावरणात फरक पडला. थंडी काहीसी कमी झाली. आता पुन्हा थंडीचा गारठा वाढू लागला आहे. पावसाचा, ढगाळ वातावरणाचा आणि आता धुक्याचा परिणाम शेतीतील रब्बीच्या पिकांवर होत आहे. शेतशिवारात सध्या गव्हाचे पीक चांगले बहरात आले आहे. काही ठिकाणी तुरीचे पीकही काढणीला आलेले आहे. तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेतकऱ्यापुढे संकटच
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र, परतीच्या पावसाने तेही हातचे गेले. आता रब्बी हंगाम पाण्याच्या मुबलकतेने चांगला जाईल. अशी आशा बाळगून असलेला शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावला आहे.

तूर काळवंडली
ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडत असल्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतित झाला आहे. तूर काळी पडली तर मालाची प्रतवारीवर परिणाम होतो. परिणामी बाजारात दरही घसरतो. लागवडीपासून ते फवारणी ते बाजारात पोहचेपर्यंत तुरीच्या पिकावर बराच खर्च करावा लागतो. काळसर तुरीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. परिणाम शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडणार नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गव्हाची वाढ खुंटली
गव्हाला पोषक थंडी नसल्यामुळे वाढ खुंटली आहे. गव्हाचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही भागात गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गव्हाच्या पिकाला थंडीचे वातावरण पोषक असते. थंडीमुळेच ओंबीत दाणे भरले जातात. मात्र, ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होते आणि त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. रब्बीतील इतरही पिकांवर कमी- अधिक प्रमाणात ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची भिती आहे.

या फवारण्या कराव्यात
तुरीवर शेंगमाशी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इमामेक्टीन बेन्झाएट 5 एसजी 10 लिटर पाण्यात 4.5 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 10 लिटर पाण्यात 3 मिली फवारावे. गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यामुळे शिफारशीनुसार किटकनाशकाची फवारणी करावी. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्विनॉलफॉस 20 ईसी 10 लिटर पाण्यात 20 मिली अशी फवारणी करावी. 

- बापू गावीत, तालुका कृषी अधिकारी, नवापूर 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT