mahavitaran farmer 
उत्तर महाराष्ट्र

चक्‍क गोल्ड लोन काढले अन्‌ भरले वीजबील

फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या आमलाड शिवारातील ३९ क्रमांकाच्या रोहित्रावरील कनेक्शनधारक शेतकरी सुधाकर काशिनाथ पिंपरे यांनी आपले उसाचे कोवळे पीक वाचवण्यासाठी चक्क गोल्ड लोन काढून आपले वीज बिल भरले आहे. तरीही बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळत नसून उलट पिंपरे यांच्यावरच रोहित्रावरील दुसऱ्या शेतकऱ्यांनीही वीज बिल भरावे, असा दबाव टाकला जात आहे. महावितरणच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून कंपनीच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
बिघाड झालेले रोहित्र बदलून देण्याची विनंती शेतकरी करत असूनही कंपनीने रोहित्र बिघाड झाल्याचा रिपोर्ट अजूनही पाठवलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रोहित्रावरील कनेक्शनधारक सर्व शेतकऱ्यांनी विज बिल भरले तरच रोहित्र चालू करण्याची भूमिका महावितरण कंपनीने घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रामाणिकपणे व कर्ज काढून विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचे होत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. 

कृषी योजनेतंर्गत लाभ तरीही
महावितरण कंपनीकडून सध्या कृषी योजनेअंतर्गत सवलती देऊन शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यानुसार अनेक शेतकरी वीज बिल भरून सवलतीचा लाभ घेत आहेत. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले आहे, त्या शेतकऱ्यांना आपल्या रोहित्रावरील सर्व कनेक्शनधारक शेतकऱ्यांनी वीज बिल भरले तरच रोहित्र सुरू केले जाईल, असे सांगून रोहित्र बसवण्यास किंवा वीजपुरवठा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांना स्वतः मनवावे लागत आहे. 
 
उसाचे पेमेंट आल्यावर भरणा 
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडे उसाचे पेमेंटचे पैसे अजून आलेले नाहीत. ज्यांच्याकडे पैसे होते ते शेतकरी वीज बिल भरत आहेत. उसाचे पेमेंट आल्यानंतर वीजबिल भरण्यामध्ये वेग येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे मात्र पिके वाचवण्याची कसरत करावी लागत असल्याचे शेतकरी व्यथा मांडत आहेत. 
 
शासनाच्या कृषी योजना २०२० नुसार सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरून योजनेतील सवलतीच्या लाभ घ्यावा तसेच चालू बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीला सहकार्य करावे. 
- इमरान पिंजारी, कनिष्ठ अभियंता, महावितरण तळोदा 
 
दोन महिन्यापासून बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळालेले नाही. त्यासाठी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. नव्याने लावलेल्या ऊसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. 
- प्रशांत माळी, शेतकरी तळोदा 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT