उत्तर महाराष्ट्र

पांझरा नदीवरील बारा कोटींचा पूल पाण्यात !

प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (ता. अमळनेर) : खानदेशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्‍वर मंदिरावर जाण्यासाठी शासनाकडून पांझरा नदीवर बारा कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात आला आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ता हा नीम येथील एका शेतकऱ्यांच्या शेतातून गेला आहे. त्यांनी हा रस्ता कुंपण घालून बंद केला आहे. भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाल्यानंतरच रस्ता मोकळा करू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे भाविकांची मंदिरावर जाण्यास अडचण झाली आहे. 

निम येथील महिला शेतकरी विजयाबाई जगन्नाथ पाटील व त्यांची मुले महेंद्र जगन्नाथ पाटील, संदीप जगन्नाथ पाटील यांनी तारकुंपण लावून हा रस्ता बंद केला आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनधारकांना पुन्हा फिरून जावे लागत आहे. बारा कोटींचा हा पूल पाण्यात गेला की काय असा प्रश्‍न भाविक उपस्थित करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी पांझरा नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी मुडावद येथील ग्रामस्थांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार निधीतून बारा कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, मुडावद ते कपिलेश्वर पुलाचा समांतर रस्ता हा एका खाजगी शेतातून काढला गेला. मोबादला मिळत नसल्याने पुलाच्या बांधकामाला विरोधही करण्यात आला होता. पूल बांधताना एका शेतातून समांतर रस्‍ता जातो याचा सर्वेक्षणाप्रसंगी विचार व्हायला हवा होता, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच मुडावद ते नीमच्या कपिलेश्वर रस्त्याला जोडणारा सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र, मुडावदपासून पांझरा नदीवरील पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाले. पुढे शेत असल्याने ते अपूर्ण थांबविण्यात आले आहे. 

कामाची चौकशी व्हावी 
पुलाला जोडणारा रस्ता हा एका खासगी मालकाचा शेतातून जातो की ती जागा शासकीय मालकीची आहे याची चौकशी करणे गरजेचे होते. ती जमीन शासकीय असेल तर पुलाला जोडणारा रस्ता डांबरीकरण का नाही झाला ? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह नीमच्या ग्रामस्थांनी केली आहे. 

आईला कुठलीही कल्पना न देता शेतातून वापर सुरू केला आहे. परिणामी आमचे दोन वर्षांपासून नुकसान होत आहे. आम्ही दोन्ही भाऊ सैन्य दलात असल्याने शेतीकडे लक्ष देता येत नाही. हा आमच्यावरील अन्याय आहे. याबाबत सखोल सखोल चौकशी करण्यात यावी. 
 संदीप पाटील, शेतमालक, निम, ता. अमळनेर. 


निम कपिलेश्वर हद्दीतील खासगी शेतातून जाणारा रस्ता पूर्वापार रहदारीचा असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत भूसंपादन प्रस्ताव मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. रस्ता वापरात यावा यासाठी लवकरच उपाययोजना करू. 
 श्याम भोसले, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, धुळे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT