cotone
cotone 
उत्तर महाराष्ट्र

शेतीत टाकलेला पैसा भी निघना...घरातच माल पडलाय

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- कोरोना व्हायरसमुळे आज जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले असतांना शेती आणि शेतकरी यांना चांगलाच फटका बसत आहे.चाळीसगाव तालुक्यात अद्यापही शेतकऱ्यांकडे घरात कापूस पडून आहे. लॉकडाऊनमुळे कापूस खरेदी थंडावली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुसरीकडे घरात कापूस पडून असल्याने अंग खाजरेपणाची लागण सुरु झाली आहे.लहान मुले व वृद्धांना सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे. आणखी जास्त दिवस कापूस घरात पडून राहीला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसून त्यांचे कंबरडे मोडणार आहे. 

चाळीसगाव तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. गेल्या तीन चार वर्षापासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला मात्र शेवट्च्या टप्प्यात अति पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. उत्पादन निम्म्याने घटले. या स्थितीतही शेतकऱ्यांना हाती आलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने तो घरात साठवून ठेवला.काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कापूस विकुन मोकळे झाले. तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करत कष्टाने कापसाचें पीक घेतलं आहे.

 मोबदला आलेला नाही
ज्या शेतकऱ्यांनी कापूस  शासकीय खरेदी केंद्राद्वारे विकला. हा कापूस विकल्यानंतर हातात चांगले पैसे येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्याच्या हातात आतापर्यंत आद्यापही मोबदला आलेला नाहीे. हा मोबदला शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होणार होता. अपुऱ्या मनुष्यबळा अभावी पैसे खात्यात जमा करण्यास विलंब होत आहे.देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना इतर दिवसांप्रमाणे आपली कामे करता येत नाही.जवळपास दीड महिना झाला तरी बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हाताश झाला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच कापूस पडून असल्याने उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
 
आजाराची लागण....
लॉकडाउनच्या काळात काही शेतकऱ्यांकडे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही आता पैसे उरलेले नाहीत.अडचण दूर करण्यासाठी सरकारने कापसाची खरेदी तात्काळ सुरु करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवल्याने आजाराची लागण होत आहे.एकीकडे लॉकडाऊनमुळे घरातुन बाहेर पडता येत नाही अशी स्थिती असतांना दुसरीकडे घरात जास्त काळ ठेवलेल्या कापसामुळे अंग खाजरेचा आजार बळावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत सापडला आहे. घरात बसावे तर कापसामुळे आजाराची भीती बाहेर यावे तर लॉकडाऊनचे उल्लंघन या कात्रीत ग्रामीण जनता सापडली आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांना घरातच कापूस साठवून ठेवला होता. मात्र कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या आशेचे पाणी फेरले गेल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT