उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात घेतले स्वतःला कोंडून,

भरत बागुल

पिंपळनेर : गेल्या पंधरा महिन्यापासून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्याचा प्रकार सोमवार बाजार समिती कार्यालयात घडला शेतकरी व बाजार समिती यांच्यातील वाद सोडविण्यासाठी यावेळी पीएसआय भूषण हंडोरे घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची संवाद साधला.


गेल्या पंधरा महिन्यापासून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या आश्वासन आधारे शेतकऱ्यांनी आज येथील उपबाजार समितीच्या कार्यालयात येऊन सचिव यांची भेट घेतली व पैसे करून द्या असे सांगत शेतकरी कार्यालयात बसून होते. पंधरा महिने होऊन देखील शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वतःहून कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही असे ठणकावून सचिव अशोक मोरे यांना सांगण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत सचिवांना चांगलेच धारेवर धरत आमच्या पैसे द्या असे सांगितले तसेच बाजार समितीत एकाही व्यापाराच्या कागदपत्र जमा नसतांना व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये माल खरेदी करू देतात कसे असा प्रश्न केला.

सचिव व शेतकऱयांत शाब्दीक वाद

तसेच एका बाजूला व्यापारी गुन्हा दाखल असून संबंधित व्यापारी दीपक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल असून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांद्याचा लिलाव केला असल्याने पैसे देण्याची जबाबदारी ही बाजार समितीची आहे असे शेतकरी ठणकावून सांगत आमचे पैसे त्वरित द्या यामुळे सचिव व शेतकरी यांच्यात शाब्दिक गोंधळ उडाला सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी बाजार समिती कार्यालयात बसून होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT