jalyukt shivar bandhara
jalyukt shivar bandhara 
उत्तर महाराष्ट्र

पाणी झुळझूळ का वाहे...तर सिमेंटच पचविले 

अंबादास बेनुसकर

देशशिरवाडे (धुळे) : साक्री तालुक्‍यातील चिकसे, देगाव- गव्हाणीपाडा या गावाच्या वेशीवर असलेल्या हिंगोटी नाल्यावर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बंधारा बांधण्यात आला आहे. निकृष्ट कामामुळे बंधाऱ्यात पाणी साचत नसून बंधाऱ्याच्या भिंतीला पायापासून गळती लागली आहे. यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ शकत नसल्याने पावसाचे पाणी भिंती खालून वाहून जात आहे. 

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत हिंगोटी नाल्यावर बंधारा बांधून घेतला. गेल्यावर्षी चार लाख 88 हजार रुपये खर्चुन बंधारा बांधण्यात आला. परंतु बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे गळती लागली आहे. जवळपास 18 ते 20 मीटर लांबी असलेल्या बंधाऱ्याचे काम व्यवस्थित करण्यात आलेले नाही. काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

एक मीटरचे सिमेंट खाल्ले
प्रत्यक्ष बांधकामात बंधाऱ्याची उंची तीन मीटरवरून एक मीटरने कमी केल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागच्या वर्षी नाल्याला पहिल्यांदा पाणी आले. तेव्हाच बंधाऱ्याखालील गाळ वाहिल्याने पाण्याला बंधाऱ्याखालून वाट मिळाली. परिसरातील शेतकऱ्यांनी दगड मातीची भर पायथ्याजवळ केली. यामुळे काही दिवस पाणी साचले. मात्र दोन- तीन आठवड्यातच पुन्हा गळती सुरू होऊन सर्व पाणी बंधाऱ्याखालून वाहून गेले असल्याचे शेतकरी किसन अहिरे, जितेश अहिरे, दादाजी ठाकरे यांनी सांगितले.

तक्रारीनंतर पाहणीही नाही
यंदा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आलेले असताना निकृष्ट बंधाऱ्यामुळे ते पाणी अडवले जात नसल्याचे चित्र आहे. चिकसेचे उपसरपंच संजय जगताप यांनी महिनाभरापूर्वी साक्री पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता महाजन यांना याबद्दल कल्पना दिली. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तीन दिवसात दुरुस्तीचे काम सुरू होईल; असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणीही आले नसल्याचे चिकसेचे उपसरपंच संजय जगताप यांनी सांगितले. चार लाख 88 हजार रुपये खर्चुन बांधकाम केलेल्या या बंधाऱ्यांची साठवण क्षमता तीन टीसीएम असताना बंधाऱ्याच्या खालून पाणी वाहून जात असल्याने तीन लिटर सुद्धा पाणी अडवले जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बंधाऱ्याचे पुनर्मूल्यांकन होऊन त्याची त्वरित दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवावे,अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT