sanjay gandhi niradhar scheme 
उत्तर महाराष्ट्र

आधार देणारेच झाले निराधार

सकाळ वृत्तसेवा

मदाने (धुळे) : शहादा व इतर तालुक्यातील तहसील कार्यालयांमधील संजय गांधी निराधार शाखेतील आयटी असिस्टंट संगणक चालक सात महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांच्या संजय गांधी निराधार शाखेत पुण्याच्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे 8 मार्च 2019 ला कंत्राटी 430 कर्मचाऱ्यांना योजनेचे काम करण्यासाठी सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये नियुक्ती दिली आहे. हे कर्मचारी कार्यालय प्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. शासन निर्णयानुसार प्रति आयटी असिस्टंट साडेदहा हजार रुपये मानधन आहे. तर कधी 8800 मानधन दिली. कंपनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून ठरल्यानुसार मानधन देत नाही. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सहा महिने झाले. तरीही मानधन दिले नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्री व कक्ष अधिकारी सचिवांना वेळोवेळी ई-मेलने पत्रव्यवहार केला आहे. प्रशासन संबंधित कंपनीला मानधनाबाबत विचारणा करीत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अधिकाऱ्यांनी आयटी असिस्टंट कर्मचाऱ्यांच्या वेतन आकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागातून आमच्याकडे येथे सद्यस्थितीत आम्हाला फंड प्राप्त न झाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देता आलेले नाही. 
- प्रवीण प्रभूणे, व्यवस्थापक, ब्रिक्स इंडिया प्रा. लि. पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT