उत्तर महाराष्ट्र

अतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा "जैसे थे' 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्याने या रस्त्यांची स्थिती पुन्हा "जैसे थे' झाली आहे. 
महापालिकेने पोलिस बंदोबस्तात शहरातील मुख्य पाच रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यात कोर्ट चौकातील न्यायालयाच्या भिंतीला लागून असलेली 21 दुकाने व तहसील कार्यालयाजवळील 35 दुकाने तोडण्यात आली. तसेच सुभाष चौक, गांधी मार्केट, बेंडाळे चौक, चित्रा चौक, गांधी मार्ग, शास्त्री टॉवर, सराफ गल्ली, सुभाष चौक, बळीराम पेठ आदी रस्त्यांवरील अतिक्रमणेही काढण्यात आली. परंतु अतिक्रमण काढलेल्या मोकळ्या जागांवर पुन्हा अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे. 

अतिक्रमण काढल्याने वाढली समस्या 
रस्त्यालगत बांधकामांचे तोडलेले अतिक्रमण देखील समस्यांचे कारण बनत चालले आहे. याबाबत महापालिका स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी तसाच पडलेला मलबा, खड्डे असल्याने वाहने थेट पुन्हा रस्त्यावर लागत असल्याने समस्या आणखीनच वाढली आहे. 

वाहतुकीस अडथळा 
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मुख्य रस्त्यांसह अनेक बाजारपेठांतील अनेक गल्ल्यांमधील अतिक्रमण काढले. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या जागांवर हॉकर्स, विविध विक्रेत्यांचे पुन्हा अतिक्रमण होऊ लागल्याने रस्ते पुन्हा वाहतूक कोंडीत सापडलेले दिसत आहेत. 

पथक दुसरीकडे कारवाईत व्यस्त 
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक बाजारपेठेतील लहान गल्ल्यांमधील अतिक्रमण काढणे, तसेच रस्ते मोजणीच्या कामात व्यस्त आहे. परंतु अतिक्रमण काढलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मोठे परिश्रम घेऊन केलेली ही कारवाई व्यर्थ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

बेशिस्त पार्किंगचा प्रश्‍न कायम 
एकीकडे रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडथळा होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु अतिक्रमण काढूनही नेहमीप्रमाणे खासगी व्यापारी संकुलांबाहेर, बॅंका, रुग्णालयांबाहेर नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT