उत्तर महाराष्ट्र

"बेटी बचाओ'मधील कामगिरीमुळे जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव 

सकाळ वृत्तसेवा

जळगावः "बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्याने गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली. यामुळे जिल्ह्यात मुलींची संख्या वाढली आहे. याची दखल केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाने घेतली आहे. नवी दिल्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांचा 7 ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे. 
याबाबत केंद्रीय महिला बालविकास मंत्रालय, दिल्ली कार्यालयाचे अप्पर सचिव आर. मोसेस चलाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना पत्र दिले आहे. 
जिल्ह्याने "बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियांनतर्गत लिंग गुणोत्तर (एसआरबी)सह सुधारणेवर सातत्याने भर दिला आहे. जिल्ह्याने 2014-15 ते 2018-19- या काळात एमओएच व एफडब्लूच्या (एचएमआयए) नुसार सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यामुळे हा सन्मान होणार आहे. 
महिला बालविकास मंत्रालयाने 5 राज्ये आणि 10 जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांनी मागील वर्षात जन्म प्रमाण (एसआरबी) मध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे पत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Nagpur High Court: महिनाभरात सर्व प्रकरणांची उत्तरे देऊ; उच्च न्यायालयात नगरविकास विभागाची ग्वाही

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

SCROLL FOR NEXT