satpuda adivasi pada imege 
उत्तर महाराष्ट्र

शहरांशी संपर्क नसल्याने आदिवासी पट्टा "सेफ' ...खानदेशातील चित्र !

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : खानदेशातील आदिवासी क्षेत्रातील लोकांचा शहरांशी फारसा संपर्क नसल्याने ते कोरोना संसर्गापासून "सेफ' आहेत. या आदिवासींमधील रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असते. विशेषतः महिलांमध्ये तर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांनी या संक्रमणापासून दूर राहणे हेच हिताचे आहे, असे आदिवासी भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रांतात राहणाऱ्या समुदायाच्या रोगप्रतिकारशक्तीचा उल्लेख सध्या विविध चर्चांमधून केला जात आहे. खानदेशात नंदुरबारसह धुळे, जळगाव जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र मोठे आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा या तीन तालुक्‍यांसह मुक्ताईनगर तालुक्‍यातही काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. त्यांना कोरोना संसर्गाचा धोका किती, यासंदर्भात मते जाणून घेतली असता विविध विचार समोर आलेत. 

रोगप्रतिकारशक्ती कमीच 
प्रतिभा शिंदे (लोकसंघर्ष मोर्चा) : राज्यातील "ह्यूमन इंडेक्‍स' कमी असलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये जालना वगळता सर्व जिल्हे आदिवासी बहुल आहेत. त्यावरून आदिवासींमधील शिक्षण, आरोग्य व अन्य घटकांचे प्रमाण दिसते. आदिवासी महिलांमध्ये हिमोग्लोबिन अत्यंत कमी असते, त्यामुळे त्यांची मुलेही कुपोषित असतात. त्यातून सिकलसेलसारखे आजारही त्यांच्यात अधिक आहे. अशा स्थितीत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. सध्या हे आदिवासी शहरांपासून विलग असल्याने तेवढा त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. मात्र, एखाद्याला लागण झाली, तर ते गंभीर ठरू शकेल. 

शहरांपासून दूर असल्याने "सेफ' 
राजेंद्र गाडगीळ (पक्षीमित्र, अभ्यासक) : आपल्या भागातील आदिवासींचा शहरांशी फारसा संपर्क येत नाही. त्यांच्या भागात कुणीही जात नाही आणि तेदेखील या दुनियेपासून अलिप्त असतात. त्यामुळेच कोरोनाच्या कहरात अद्याप तरी हे लोक "सेफ' आहेत. मात्र, त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती फार असते, असे समजण्याचे कारण नाही. एकदा त्यांच्यात संक्रमण झाले, की ते वाढतच जाण्याचा धोका अधिक आहे. 

संक्रमणाचा धोका कमीच 
राजेंद्र नन्नवरे (सचिव, सातपुडा बचाव समिती) : आपल्या क्षेत्रातील आदिवासी बांधव मुख्यत्वे त्याच भागात राहतात, त्यांचा शहरांमध्ये फारसा वावर नसतो. 15 मार्चला आम्ही मेळघाटला होतो, तेथे ही मंडळी त्यांच्या उत्सवात मश्‍गूल होती. त्यांना अशा संसर्गांच्या विषयांशी काही देणेघेणे नसते. आपल्या आदिवासी बांधवांचेही तसेच आहे. जोपर्यंत संक्रमित व्यक्ती त्यांच्यात मिसळणार नाही, तोपर्यंत त्यांना हा धोका नाहीच. मात्र, संसर्ग झाला, तर हे लोक अधिक प्रभावित होऊ शकतील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT