eknath khadse 
उत्तर महाराष्ट्र

चंद्रकांतदादांनी दाखविलेल्या धाडसाचे अभिनंदन ः एकनाथ खडसे 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जावून महाविकास आघाडीचे नवीन सरकार आले. भाजपमधील मेगा भरतीमुळे पक्षातील निष्ठावंतावर अन्याय झाला आणि जे बाहेरून आले त्यांना मोठी पदे देण्यात आली. या अगोदर केवळ मीच बोलत होतो, आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीही मान्य केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मेगा भरतीबाबतची वस्तुस्थिती मांडली, त्यांनी ते बोलण्याचे धाडस दाखविले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन असल्याचे एकनाथ खडसे यांनी आज येथे सांगितले. 

जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, कि भारतीय जनता पक्षात मेगा भरती प्रथमच झाली असे नाही, मात्र अगोदर सन 2009 च्या विधानसभा निवडणूकीच्या काळातही आपण भरती केली होती. मात्र त्यावेळी ज्यांची भरती झाली ते निवडून आले होते. मात्र आता भरती करण्यात आलेल्यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्यांनाही भरती करून घेण्यात आले. त्यामुळे जे भरती करण्यात आले ते सर्व पडले. 

वाल्याचे वाल्मिकी होत नाही 
मेगा भरतीबाबत ते म्हणाले, कि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांचे आरोप तपासून घेवून त्यांना प्रवेश देण्याची गरज होती. मात्र अशी कोणतीही पार्श्‍वभूमी न पाहता ही भरती करण्यात आली, त्यांना उमेदवारीही देण्यात आली. केवळ भरती झाले म्हणून एकाएकी ते वाल्याचे वाल्मिकी होत नाही. त्यामुळे या भरती झालेल्या सर्वांचाच निवडणूकीत पराभव झाला. 

पक्ष यातून बोध घेईल 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगा भरतीतील चुक मान्य केली आहे. त्यामुळे आता पक्ष यातून निश्‍चितच बोध घेईल. नव्याने पक्षाची रचना करून निष्ठवंताना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT