उत्तर महाराष्ट्र

"ती' तरुणी प्रियकरासोबतच जाण्यावर ठाम 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरातील ट्रॅफिन गार्डन परिसरातील तरुणाने प्रेमप्रकरणातून शहरातीलच एका भागातील तरुणीला घेऊन पलायन केले होते. या दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, दहा ते पंधरा दिवसांनंतर प्रेमीयुगुल शहरात परतले. हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचले. दोघांचे नातेवाइक एकमेकांसमोर ठाकले होते. मात्र, तरुणी तरुणासोबत जाण्यावर ठाम असल्याने हा वाद मिटला. 
शाहूनगर परिसरातील तरुणी मुस्कान (नाव बदललेले) शहरातील एका महाविद्यालयात शिकते. परीक्षा सुरू असल्याने अर्थशास्त्राचा पेपर देण्यासाठी ती घराबाहेर पडली. पेपर झाल्यावर पुन्हा ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतल्यावर ती मिळून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याचवेळी याच परिसरातील शाहरुख (नाव बदललेले) बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. 

पेपरनंतर दोघे बाहेरगावी रवाना 
दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम सुरू आहे. याच प्रेमातून 9 मार्चला घर सोडून बाहेरगावी पलायनाचा निर्णय घेतला. मुस्कानचा पेपर झाल्यानंतर ती बाहेर आल्यावर शाळेजवळून शाहरुखने तिला सोबत घेतले. दोघे बाहेरगावी निघून गेले. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांकडून दोघांना फोन केले जात होते. दोघांचेही कुटुंब त्यांना विनवणी करीत होते. त्यानुसार 17 मार्चला सकाळी मुस्कान व शाहरुख जळगावला परतले. मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. 

पोलिसांनी घेतले जबाब 
मुस्कानला तिचे भाऊ, तसेच आईने घरी येण्याबाबत विनवणी केली. एकीकडे प्रेम, तर दुसरीकडे कुटुंबीय यामुळे मुस्कानसमोर इकडे आड- तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली. तासाभरानंतर मुस्कानने मला शाहरुखसोबतच जायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यानुसार दोघांचे जबाब नोंदविले. त्यानंतर वाद शमला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT