उत्तर महाराष्ट्र

जळगाव बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद !

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार बंद ठेवण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भाजीपाला मार्केट देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मात्र शेतकरी थेट माल विक्रेत्यांना विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना ऐरवीपेक्षा नफा अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 

शहरात तीन दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीच्या काळात किराणा दुकान, भाजीपाला, औषध विक्रेते, वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहे. तसेच खासगी वाहतूक सेवा देखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. परंतु खासगी वाहने बंद असल्याने भाजीपाल्याची आवक अत्यंत मंदावली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने शेतकरी थेट विक्रेत्यांनाच भाजीपाला विक्री करीत आहे. तसेच भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. 

शेतकरी दररोज आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन येत असतो. परंतु बाजार समिती बंद असल्याने शेतकरी माल थेट विक्रेत्यांना विक्री करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आडत्यांपेक्षा दोन पैसे शेतकऱ्यांना अधिक मिळत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

आवक घटल्याने भाजीपाला महागला 
संपूर्ण जिल्ह्यातून जळगावात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु संचारबंदी लागू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला असून भाजीपाल्याच्या किंमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

आडत असोसिएशनतर्फे बंद 
कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला समितीतर्फे 31 मार्चपर्यंत सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहे. याबाबत त्यांनी परिपत्रक देखील काढले आहे. तसेच आडत असोसिएशनतर्फे देखील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT