railway water 
उत्तर महाराष्ट्र

लुटमार : वीस रूपयाची बाटली 70 रूपयाला 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेल्वे सध्या बंद असल्या, तरी मुंबई, दिल्लीहून थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात जाण्यासाठी परप्रांतीयांना विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वे जळगावस्थानकावर थांबल्यावर स्थानकात पाण्याची बाटली चक्क 50 ते 70 रुपयांना विकून प्रवाशांची लूट केली जात आहे. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस, आरपीएफ पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. 
मुंबई, दिल्लीहून सुटणाऱ्या काही रेल्वे जळगावला थांबतात. जळगाव रेल्वेस्थानकात पाणपोई आहेत मात्र त्यांचे नळ तुटलेले आहेत. त्यात पाणी नाही. जी मंडळी पाण्याच्या बाटल्यांची विक्री करते ते 20 रुपयांची पाण्याची बाटली 50 ते 70 रुपयांना विकते. प्रवासी गरज म्हणून ही महागडी पाण्याची बाटली खरेदी करतात. तोच प्रकार विविध बिस्कीट पुडे, खाद्यपदार्थ विक्रीबाबत घडतो. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची लूट होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. 

नळ तुटके का? 
गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वेगाड्या बंद आहेत. असे असताना रेल्वेस्थानकातील तुटके नळ, इतर दुरुस्तीस रेल्वे प्रशासनाला वेळ होता. मात्र, रेल्वे प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने प्रवाशांना पाण्याविनाच राहावे लागत आहे. 

आरक्षण सुरू; प्रतिसाद नाही 
जळगाव रेल्वेस्थानकात रेल्वेने आरक्षण सुविधा सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. केवळ परप्रांतात जाणारे प्रवाशीच येऊन आरक्षण करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT