live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

तापीचे पाणी आटले, विहिरी- कूपनलिका 40 फुटांनी खोल 

सकाळवृत्तसेवा

रावेर : तापी नदीपात्रातील पाणी यंदा नेहमीपेक्षा लवकर आटल्याने तालुक्‍याच्या पूर्वेकडील गावांतील विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी घसरली आहे. अजून पावसाळा दोन महिने लांब असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. 

तापी नदी तालुक्‍याच्या दक्षिण दिशेने वाहते. तालुक्‍यातील अजनाड, दोधा, नेहता, अटवाडे, धुरखेडा, ऐनपूर, थेरोळा, निंभोरासीम, सुलवाडी, कोळदा आदी गावातून वाहते. नदीपात्रात खालच्या बाजूस असलेल्या हतनूर प्रकल्पामुळे उन्हाळ्यात देखील नदीपात्रात पाणी राहते. यामुळे परिसरातील कूपनलिका आणि विहिरींना भरपूर पाणी असते. यावर्षी मात्र हतनूर प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने दोधा, नेहता, अटवाडा आदी गावांजवळील पाणी आटले आहे. नदीपात्र उघडे पडले असून केवळ वाळू दिसत आहे. यामुळे या तिन्ही गावांच्या परिसरातील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी खोल गेले आहे. मागील वर्षीपेक्षा किमान 40 फुटांनी जलपातळी घसरली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT