live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

पांचाळांची 28 वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोहार, पांचाळ वस्तीला सन 1991 मध्ये स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून आजवर या लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी तब्बल 28 वर्षांपासून ही भटकंती सुरू असून, आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी राहणाऱ्यांना पाणी पैसे देऊन खरेदी करावे लागत आहे. 
ृृगावोगावी भटकंती करून लोखंडाला आकार देण्याचे काम करणारा लोहार, पांचाळ समाज गेल्या काही शतकांपूर्वी ठिकठिकाणी स्थायिक झाला आहे. व्यापारीदृष्ट्या शहराचा विकास होताना न्यू बी. जे. मार्केटच्या जागेवर असलेल्या लोहार, पांचाळ समाजातील 27 कुटुंबांना 1991 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुरेशदादा जैन यांनी स्थलांतरित केले. त्यानंतर तेथे प्रशस्त बी. जे. मार्केट उभारण्यात आले. तेव्हापासून हा समाज स्थलांतरित झालेल्या ठिकाणी झोपडपट्टीत आपला पारंपरिक लोहार व्यवसाय करून उदरनिर्वाह केला जात आहे. ज्यावेळी या समाजाचे या जागेत स्थलांतर झाले तेव्हापासून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच या नागरिकांच्या घरात वीजही नसल्याने अनेक कुटुंबे आजही अंधारातच जीवन जगत आहेत. 

पाण्यासाठी 28 वर्षांपासून लढा 
स्थालांतरित झालेल्या जागेत पांचाळ कुटुंबीयांची दुसरी पिढी वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करीत आहे. गेल्या 28 वर्षांपासून कासमवाडी, गणेशवाडी परिसरातील नागरिकांकडून हा समाज महिन्याला ठरल्याप्रमाणे पैसे देऊन त्यांच्याकडून पाणी खरेदी करीत आहे. 

मूलभूत सुविधांपासून वंचित 
पूर्वी न्यू बी. जे. मार्केटच्या जागेत असलेल्या भंगार व्यावसायिकांचेही लोहार, पांचाळ समाजबांधवांसमवेत स्थलांतर केले. स्थलांतर केलेल्या कुटुंबांची प्रशासनाकडून कोणतीच कागदोपत्री नोंद नसल्याने त्यांना गॅस, वीज, पाण्याचे कनेक्‍शन, घरकुल योजना यासह शासनाच्या एकाही योजनेचा लाभ मिळत नाही. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांनी अनेकदा आंदोलनेही केली. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आजही हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. 

...म्हणून घरकुलापासून वंचित 
लोखंडाला आकार देऊन उदनिर्वाह करणारा पांचाळ समाज आजही शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासच आहे. हा समाज वास्तव्यास असलेल्या जागेसंदर्भात महापालिका व बालाजी संस्थान यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद अनेक वर्षांपासून सुरू असल्याने येथे घरकुल योजना राबविण्यातही अडथळे येत आहेत. 

आमच्यासह भंगार व्यावसायिकांचेही न्यू बी. जे. मार्केटच्या जागेतून स्थलांतर केले गेले. काही वर्षांनंतर भंगार व्यावसायिकांना करार करून जागा दिली. मात्र, लोहार, पांचाळ समाजाला आजवर कोणतीही जागा दिलेली नाही. निवडणूककाळात आश्‍वासने मिळतात. मात्र त्यानंतर एकही आश्‍वासन पूर्ण होत नाही. हक्कासाठी आमचा 28 वर्षांपासून लढा सुरू असून, तो यापुढेही सुरूच राहील. 
- तुकाराम पवार, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT