payment 
उत्तर महाराष्ट्र

राज्यातील इंग्रजी शाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांची ४० ते ५० टक्के शुल्क पालकांकडे अडकून पडली आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी संस्थाचालकांपुढे मोठी प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील सहा लाख शिक्षक, ८० हजार चालक ,एक लाख शिपाई व मावशींचे दोन महिन्याचे सुमारे २४० कोटीची गरज आहे. फी वसूल न झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी यावर मार्ग काढावा, अशी मागणी इंग्रजी माध्यम शिक्षण संस्था चालकांनी केली आहे. 

कोरोना महामारीचा प्रसार वाढला अन् राज्यात २२ मार्च पासून संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. परंतु त्याच्याही दहा दिवस आधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था १४ मार्च पासून बंद करण्याचे राज्य शासनाने आदेश दिले.ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपये फी च्या रूपात पालकांकडे थकले. इंग्रजी शाळांचे जवळपास ३० ते ४० टक्के फी ही पालकांकडे थकीत आहे. ग्रामीण भागातील संस्थाचालकांची यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. कारण ग्रामीण भागातील बऱ्याच शाळांच्या जवळपास पन्नास टक्के फी थकीत आहे. ग्रामीण भागात पालक नेहमीच शेवटच्या परीक्षेपर्यंत फी भरण्याचा प्रयत्न करतात.जेव्हा शासनाने पहिल्या लॉकडॉउनची घोषणा केली त्यावेळी लॉकडाऊन २१ दिवसाचे होते. त्यानंतर ते दोनवेळेस वाढवण्यात आले व आता अठरा मे पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आलेली आहे. वरून शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी आदेश काढला की लॉकडाऊन असेपर्यंत इंग्रजी शाळांनी फीसाठी सक्ती करू नये. या आदेशाचे शाळांनीही पालन केले. परंतु लॉकडाऊन आता साठ दिवसापेक्षा जास्त वाढल्यामुळे इंग्रजी शाळांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता राज्यातील सहा लाख शिक्षक, ऐंशी हजार ड्रायव्हर व जवळपास एक लाख शिपाई ,मावशींच्या पगार रखडला आहे.पगारापोटी इंग्रजी शाळांना एकशे वीस कोटीची गरज आहे. एप्रिल व मे महिन्यासाठी २४० कोटीची आवश्यकता आहे.हा मोठा प्रश्न आहे. आता हे पैसे आणायचे कुठून, कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे? 

आर टी ई ची रक्कम थकीत 
शिवाय या शाळांना गेल्या दोन ते तीन वर्षांचे आर टी ई २५ टक्के प्रवेशांची फी परतावा देण्यात आलेला नाही. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एक- एक वर्षांपासून रक्कम येवुन ही या शाळांना वितरित करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची शिक्षण मंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या शिक्षकांचे पगार झाले नाही तर मोठ्या प्रमाणात शिक्षकांना नोकरीपासून मुकावं लागेल ,अशी भीती निर्माण झालेली आहे. या समस्यांवर शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी तोडगा काढावा व योग्य ते निर्देश द्यावे, असे आवाहन ईसा संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा, कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग, सचिव भरत भांदरगे पाटील यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT