nandurbar bajar samiti red chilly 
उत्तर महाराष्ट्र

सुयर्दशन नाही; दिवसभर पावसाची रिपरिप, मिरचीचे नुकसान

धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी सूर्य दर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तापमानाचा पारा २१ अंशावर आला होता. वातावरणात दिवसभर गारठा होता. दरम्यान, पावसाच्या रिपरिपीमुळे मिरची व्यापाऱ्यांची पथारीवर असलेली मिरची ओली झाली, तर काहींनी गोणपाट झाकून वाचविण्याचा प्रयत्न केला. ढगाळ व पावसाळी वातावरण लक्षात घेता बाजार समितीने १४ डिसेंबरपर्यंत व्यवहार बंद ठेवले आहेत. 

गुरूवारी (ता. १०) दिवसभर ढगाळ व गारठामय वातावरण होते. आज दुसऱ्या दिवशीही सूर्य दर्शन झाले नाही. सकाळपासूनच ढगाळ व गारठामय वातावरणात पावसाची भर पडली. जिल्हाभर काही भाग अपवाद वगळता रिपरिप सुरू होती. त्यामुळे हिवाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव जिल्हावाशियांनी अनुभवला. यामुळे कापूस, मिरची, पपईचे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. 

पावसाने पुन्हा नुकसान
पावसाची रिपरिप दोन-तीन दिवस सुरूच असली, तर कापूस पिवळा व काळा पडून शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. तर लाल पिकलेली मिरची तसेच पपई झाडावरून खाली गळून नुकसान होईल. तसेच फुल बहारही नष्ट होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे. आज वातावरणात गारठा होता. तापमानाचा पारा २१ अंशावर आला आहे. दिवसभर नागरिक उबदार कपडे अंगात घालून फिरताना दिसून आले. 

१४ डिसेंबरपर्यंत व्यवहार बंद 
दरम्यान, वातावरणाची स्थिती लक्षात घेता बाजार समितीने आता १४ डिसेंबर पर्यंत खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. से राजीव सुत गिरणीतही कापूस खरेदी बंद ठेवली आहे. त्यामुळे शेतक्यांनी आपला शेतीमाल आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT