farmer loan 
उत्तर महाराष्ट्र

पीककर्जात राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर 

बळवंत बोरसे

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी पीककर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देऊनही राष्ट्रीयकृत बँकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सुरवातीला दहा जूनपर्यत पन्नास टक्के, नंतर किमान सत्तर टक्के कर्जवाटप करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावूनही आजमितीस या बॅंकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ बारा टक्केच कर्जवाटप केलेले आहे. त्यापेक्षा जास्त ग्रामीण बॅंकांनी चौदा टक्के तर खासगी बॅंकांनी पंधरा टक्के कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मात्र सर्वाधिक ६९ टक्के कर्जवाटप करीत आघाडी घेतली आहे. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या लाभासाठीही जिल्हा बॅंकेने शिखर बॅंकेची मदत घेत प्रयत्न सुरू केले आहेत. 

जिल्ह्यात यंदा गतवर्षीचा जेमतेम हंगाम आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सेतकऱ्यांना असलेला मालही विकता आला नाही. कर्ज फेडता आलेले नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेलाही आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाने बॅंकर्स समितीची बैठक घेत लिड बॅंकेसह सर्वांनाच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जवाटप करावे असे आवाहन वेळोवेळी गेतलेल्या बैठकीत केले आहे. मात्र जिल्हा बॅंक वगळता राष्ट्रीयकृत बँकांनी प्रशासनाचे हे आवाहन दुर्लक्षित केल्यासारखी स्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या मेळाव्यांतही केवळ पावणेदहा कोटींची कर्ज मंजूर होते, यावरून राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नाखूष आहेत किंवा त्यांना फारसे देणेघेणे नाही हाच मुद्दा चर्चिला जात आहे. 
 
बॅंकांच्या वागणुकीची दखल का नाही ? 
सुरवातीला कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांना खरीपासाठी कर्ज मिळू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र यामुळे बॅंका शेतकऱ्यांना दारातही येऊ देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जप्रकरणासाठी लागणारी माहिती, कागदपत्रे देऊनही कर्ज देत आहोत, म्हणजे जणू काही आम्ही उपकारच करतो आहोत अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बँकेत वागणूक मिळत असल्याने शेतकरी नाउमेद होत आहे. या बॅंकांना प्रशासन नुसते कागदोपत्री आदेश करीत आहे, त्यांचे प्रत्यक्ष कामकाज का पुढे जात नाही. दरवर्षी या बॅंका अशाच पद्धतीने वागत असूनही जिल्हाधिकारी त्याची गांभिर्याने दखल का घेत नाही असा प्रश्‍न सामान्य शेतकरी विचारत आहेत. 

बॅंकाना दिलेले २०२०-२१ चे उद्दिष्ट (आकडे लाखांत) 

बॅंक- खरिप-रब्बी उद्दिष्ट- प्रत्यक्ष कर्जवाटप- टक्के 
जिल्हा बॅंक ः७५९४.००-४१६२.८५- ६९ 
राष्ट्रीयकृत बॅंका-५७१६२.००-५३७९.००-१२ 
ग्रामीण बॅंक ः१३३१.००-१८५.००- १४ 
खासगी बॅंकाः ८४६२.००- १२८७.००-१५ 

कर्जमेळाव्यात झालेले वाटप असे 
बॅंक आॅफ बडोदा ः ३ कोटी ५५ 
बॅंक आॅफ इंडिया ः१३ लाख 
बॅंक आॅफ महाराष्ट ः १ कोटी १९ लाख 
कॅनरा बॅंक ः १३ लाख 
सेंट’ले बॅंक आॅफ इंडिया ः २ कोटी २० लाख. 
युनियन बॅंक आॅफ इंडिया ः १ कोटी ०९ 
स्टेट बॅंक आॅफ इंडिया ः६४ लाख. 
महा. ग्रामीण बॅंक ः ३५ लाख 
पंजाब नॅशनल बॅंक ः१० लाख. 
आयडीबीआय बॅंक ः७ लाख. 
(ॲक्सिस बॅंक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकेने अद्याप एकालाही कर्ज दिलेले नाही) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : दोन पोलिस अधिकाऱ्यांना केले सेवेतून बडतर्फ

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT