CRIME
CRIME CRIME
उत्तर महाराष्ट्र

शेतात कामाला गेलेल्या महिलेचा गळा चिरून खून

सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार ः कोरीट (ता. नंदुरबार) येथे शेतात (Farm) कामासाठी गेलेल्या महिलेचा (Woman) धारदार शस्त्राने गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना रविवारी (ता. ४) घडली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात (Nandurbar Taluka Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (korit village woman who went to the field was killed)

CRIME


कोरीट येथील उषाबाई कोळी (वय ४५ ) या स्वतःच्या शेतात गेल्या होत्या. त्यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी शांतीलाल जतन कोळी यांच्‍या उसाचा शेतात फेकून दिला होता. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तत्काळ पोलिसांना माहिती कळविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून हिरालाल कोळी यांनी दिलेल्या फर्यादीवरून अज्ञात मारेकरूंविरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी
नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, यावेळी दादा कोळी, भास्कर कुवर, घारू कोळी, कमलेश कोळी, सागर चित्ते, जयेश चित्ते, अर्जुन शिरसाठ, शुभम चित्ते, नीलेश कोळी, गणेश कोळी, गोपाल कोळी, मयूर कोळी, जिवन कोळी, कुलदीप कोळी, सचिव कोळी, सागर कोळी, रविदास कोळी, श्रीकांत कोळी, विशाल कोळी, दादाभाई कोळी, रूषिकेश सोनवणे, गणेश कोळी, आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT