उत्तर महाराष्ट्र

मॉं अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास  त्र्यंबकेश्‍वरमध्ये कलश यात्रेने सुरवात 

सकाळवृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर - येथील नीलगिरी पर्वतावरील मॉं अन्नपूर्णाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास आज कलश शोभा यात्रेने सुरवात झाली. सकाळी नऊला नील पर्वतापासून सुरू झालेली यात्रा शहरातून वाजत-गाजत कुशावर्तापर्यंत पोचली. बुधवारी (ता. 21) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारणमंत्री राम शिंदे उपस्थित राहतील. 

कलश शोभा यात्रेमध्ये सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराज, महामंडळेश्वर स्वामी सच्चिनानंदगिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित यांच्याप्रमाणे देशभरातील भाविक, याज्ञिक सहभागी झाले होते. प्रायश्‍चित्त नांदी श्राद्ध, गणेशपूजन, कलशपूजन, मातृकापूजन व नंतर यज्ञ मंडप प्रवेश हे विधी झाले. 

तीन एकरावर मंदिर 
ज्योतिर्लिंग मंदिराचा कलश व मॉं अन्नपूर्णाचे दर्शन अशी रचना असलेले नील पर्वतावर 3 एकरावर मंदिर उभारण्यात आले आहे. शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकच ठिकाणी असलेले त्रंबकेश्वर हे देशातील दुसरे ठिकाण आहे. वस्तुकलेचा अद्वितीय नमुना असलेले हे मंदिर संगमरवरमध्ये साकारले आहे. मॉं अन्नपूर्णासोबत सरस्वती व महाकाली यांच्याही मूर्ती असून मंदिर परिसरात भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती 1 हजार 931 किलोग्रॅम, सरस्वतीची मूर्ती 750 किलोग्रॅम व महाकालीची मूर्ती 470 किलोग्रॅम वजनाची पंचधातूची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT