agree center Pesticides
agree center Pesticides 
उत्तर महाराष्ट्र

बनवाबनवी...किटकनाशक तेही मुदत संपलेले; शेतकऱ्यांची होतेय लुट

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : शहरातील काही कृषी केंद्रातून मुदत संपलेले कीटकनाशकाची विक्री केली जात आहे. तसेच जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत आहे. यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही. यात सर्रास शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. 
नवापूर शहरातील काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना मुदत संपलेले कीटकनाशके विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संबंधित कृषी केंद्रावर जाऊन भेट दिली असता, तेथे मुदत संपलेले कीटकनाशक आढळून आले. याबाबत कृषी सेवा केंद्रचालक यांनी बेजबाबदारपणे उत्तरे दिली. शेतकऱ्यांनी कीटकनाशके घेत असतांना मुदत पाहणे गरजेचे आहे. गर्दी जास्त असल्याने आमच्याकडे मुदत संपलेले कीटकनाशक दिले गेले असतील. जे शेतकरी कीटकनाशके परत घेऊन आले, त्यांना नवीन औषधे दिली आहेत. अशी बेजबाबदार उत्तरे देऊन एक प्रकारे हम करे सो कायदा, असाच मनमानी कारभार दिसून आला. 
शेतकरी लॉकडाऊन मध्ये आधीच हैराण झाले आहे. त्यात नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली, त्यांच्यावर अस्मानी संकट उभे राहिले, पावसाने ३५ दिवस दांडी मारल्याने पीक जळून गेल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी बियाणे व रासायनिक खतांसाठी भटकंती करावी लागत आहे. बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सोडून संपूर्ण दिवस बाजारात बी,बियाणे व खत खरेदीसाठी लांबलचक रांगेत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 
 
कारवाई न झाल्यास आंदोलन 
शेतकरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नवापूर शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करीत आहे. काही कृषी केंद्रात खराब व मुदत संपलेले कीटकनाशके विक्री केली जात असल्याने शेतकरींची फसवणूक होत आहे. यासंदर्भात नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. दुबार पेरणी, शासकीय गोदामातील अपुरा खतसाठा, मुदत संपलेले कीटकनाशके, जादा भावाने रासायनिक खतांची विक्री , बी बियाणेसाठी कृषी केंद्रावर लागलेली लांब रांग डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT