live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

आमदारांची फेकुगिरी जनतेसमोर मांडा : माजी आमदार दिलीप वाघ 

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा ः ‘आमदार किशोर पाटील शासनाच्या कोणत्याही योजनेचे झालेले काम मी केले असा टेंभा मिरवत विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी एक हजार कोटीची तर कधी पाचशे कोटीची विकासकामे केली असे सांगून दिशाभूल करीत आहेत. सत्तेची गुर्मी त्यांच्या डोक्यात शिरली आहे. मागील निवडणूक काळात जी आश्वासने दिली ती त्यांनी किती पूर्ण केली? व आमदार म्हणून काय केले? हे लोकांपुढे मांडा. उद्या कदाचित महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे देखील ते श्रेय घेतील. त्यांची ही फेकुगिरी जनतेसमोर मांडा. अवघ्या ९० दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असून, नव्या उमेदीने कामाला लागा’, असे आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले. 
येथील प्रसाद हॉलमध्ये आज दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, संजय वाघ, नितीन तावडे, विजय पाटील, सतीश चौधरी, ललित वाघ, दगाजी वाघ, नाना देवरे, बशीर बागवान, सुभाष पाटील, डॉ. पी. एन. पाटील, शालीक मालकर, सुनील पाटील, राजेंद्र महाजन, भूषण वाघ, सिताराम पाटील, विकास पाटील, अशोक मोरे, भगवान मिस्तरी, प्रकाश पाटील, प्रकाश भोसले, सत्तार पिंजारी, रणजीत पाटील, युवराज महाजन, वासुदेव माळी, प्रकाश चौधरी, रवी झंवर, अजहर खान, हारुन देशमुख, अॅड. ज्ञानेश्वर सुतार, डिगंबर पाटील, अजय अहिरे, सुदाम वाघ, प्रा. माणिक पाटील, रज्जाक शेख, कृष्णा सोनार आदी उपस्थित होते. याप्रसंगी आर. एस. पाटील व प्रकाश चौधरी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सचिन गढरी, रज्जाक शेख व संतोष मिस्तरी यांनाही गौरविण्यात आले. बैठकीत प्रा. माणिक पाटील, आर. एस. पाटील, प्रकाश भोसले, शालिक मालकर, विकास पाटील, अजहर खान यांची भाषणे झाली. 
शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राबाबत शालीक मालकर व विकास पाटील यांनी टीका केली. 
दिलीप वाघ म्हणाले, की शासनाच्या विकासाच्या विविध योजनांनुसार कामे होतात. त्यांचे श्रेय आमदारांनी घेणे हास्यास्पद आहे. त्यांनी सत्तेची गुर्मी करू नये. जनतेसमोर आतापर्यंत कोणाचीही गुर्मी यशस्वी झालेली नाही. आपण किती कामे केली हे आमदारांना निश्चितपणे सांगता येत नाही. सतत आकडे बदलून ते सांगत असतात. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याचा आमदार प्रयत्न करतात. निराधार योजनेचे मानधन केंद्र शासनाने वाढलेले आहे. मुख्यमंत्री सडक योजनेची कामे सर्वत्र होत आहेत. कदाचित त्यांचेही श्रेय आमदार घेतील म्हणून आमदारांची ही फेकुगिरी जनतेसमोर मांडावी. निवडणूक जसजशी जवळ येईल तशी सर्व माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास वाघ यांनी आभार मानले. 
 
मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी 
‘ईव्हीएम’ला विरोध व मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय प्रमुख नेमून त्यांचे प्रशिक्षण घेण्यासंदर्भात निर्णय झाला. बुथ रचना अद्ययावत करण्याचे ठरविण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT