शहादा : जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे आज सायंकाळी आठ वाजता उघडले असून त्यातून एक लाख 21 हजार 430 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच वाघूर धरणाची पाणीपातळी लक्षात घेता वाघूर धरणाचे वक्रद्वार घडण्यात येऊ शकतात. दरम्यान तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी चार वाजता सारंगखेडा बॅरेजचे सात दरवाजे तीन मीटर क्षमतेने उघडण्यात आले असून त्यातून 69 हजार 128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे, तर प्रकाशा बॅरेजचेही सात दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 61 हजार 537 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुढील बहात्तर तासांसाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये.
आपली गुर-ढोरे नदीकाठी नेऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दक्ष राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.नागरिकांनी सजग व सुरक्षित रहावे. गणपती विसर्जनासाठी कुणीही नदीकाठी जाऊ नये शिवाय तापीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने नागरिकांनी सजग रहावे असे आवाहन शहादयाचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
संपादन- भूषण श्रीखँडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.