उत्तर महाराष्ट्र

महिनाभरात लाखाहून अधिक टन उसाचे गाळप 

कमलेश पटेल

शहादा : यंदा सातपुडा साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केल्यानंतर ३३ दिवसांत एक लाख १७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून ८७ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. प्रतिदिन चार हजार टन उसाचे गाळप सुरू असून, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली. 
दरम्यान, कारखाना परिसरात उसाने भरलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. 

पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील श्री सातपुडा सहकारी साखर कारखाना ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. शेतकरी, कामगार, अधिकाऱ्यांच्या मेहनतीने व संचालकांच्या मार्गदर्शनाने पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू आहे. ऊसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कारखान्यावर पुन्हा वृद्धिंगत होत असल्याचे चित्र दिसत आहे. गत वर्षी व यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. 

वाचा- दिलासादायक; नंदूरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत 

कारखान्याने या वर्षी उसाला प्रतिटन दोन हजार ३६५ रुपये भाव दिला आहे. ऊस वाहतुकीसाठी चारशे ट्रॅक्टरसह बैलगाड्या सुरू आहेत. कारखाना सुरू झाल्याने रोजगारालाही चालना मिळाली आहे. कोरोना महामारीत कारखाना प्रशासन कामगार व ऊसतोड कामगारांची आरोग्याबाबत पूर्ण खबरदारी घेत आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT