sarangkheeda barage
sarangkheeda barage 
उत्तर महाराष्ट्र

जमीन भरपाईसाठी शेतकऱ्यांचा एक तपापासून संघर्ष 

कमलेश पटेल

शहादा : सारंगखेडा (ता. शहादा) बॅरेजच्या पाण्याखाली गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचा गेल्या १२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सरकारदरबारी अर्जफाटे केले; परंतु अद्याप न्याय मिळाला नाही. यातील चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता त्यांच्या विधवा पत्नी आज ना उद्या न्याय मिळेल, या अपेक्षेने न्याय्य हक्कासाठी संघर्ष करीत आहेत. 
परिसरातील गाव व शहरांना टंचाईच्या काळात पाण्याचा सामना करावा लागू नये, परिसरातील शेती बागायती व्हावी, या उद्देशाने तत्कालीन शासनाने सारंगखेडा (ता. शहादा) बॅरेजची निर्मिती केली. या बॅरेजमध्ये पाणीसाठा झाल्यानंतर तालुक्यातील टेंभे, हिंगणी व कमखेडा या तिन्ही गावांतील सुमारे १६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. त्यांच्या शेतात बॅरेजमधील पाण्याचा फुगवटा होत असल्याने शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. दर वर्षी पाटबंधारे विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना पेरणी करू नये, अशी नोटीस मिळते. मात्र शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने निदान नुकसानभरपाई देत नसाल तर आमची शेतजमीन तरी आम्हाला कसू द्या, नाहीतर मरणाची तरी परवानगी द्या, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. लाभ मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांजवळ न्याय मागितला. लढत लढत एक तप झाले. परंतु अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नाही. बॅरेजच्या पाण्यामुळे शेतजमीन तर गेली, निदान लाल फितीच्या कारभारापायी मोबदला मिळण्यासाठी अजून किती पिढ्या लागतील, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. संघर्ष करणाऱ्या १६ शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. आता त्यांच्या विधवा पत्नींनी न्याय्य हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे. 

जमीन २००८ पासून बुडाली आहे. वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. गेल्या बारा वर्षांपासून लढत आहोत तरीही न्याय मिळत नाही. फक्त आश्वासन दिले जाते. अद्यापपर्यंत बुडीत जमिनीचे पैसे मिळाले नसल्याने मरणाची वेळ येऊन ठेपली आहे. शासन आता जीव जाण्याची वाट पाहत आहे का? 
-अशोक जगदेव, शेतकरी 

सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाच्या पाण्यात शेतजमीन गेली आहे. अर्जफाटे केले. घरधनी जिवंत असेपर्यंत जमिनीचा मोबदला मिळेल अशी आशा होती. अखेर पैसे करत करत पतीचे निधन झाले. आता लहान मुलेबाळे आहेत. घरधनी राहिले असते तर न्याय्य हक्कासाठी फिरले असते. आता मी कोठे फिरू, हा प्रश्न मनात सतावतोय. 
-मथाबई भिल, शेतकरी 
 
सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यात टेंभे येथील बारा, कमखेडा दोन, हिंगणी दोन असे १६ शेतकरी आहेत. हे प्रकरण दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काही प्रमाणात निधी आला आहे. उर्वरित निधीची मागणी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून संबंधित यंत्रणेकडे केली आहे. शासनस्तरावरून उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर लवकरच त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे जमिनीचा मोबदला वाटप केला जाईल. 
-डॉ. चेतनसिंग गिरासे, प्रांताधिकारी, शहादा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT