residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

सिझर नाकारले... अखेर गर्भपिशवी फाटल्याने तिचा झाला मृत्यु,...डॉक्टरचा हलगर्जीपणा उघड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू गर्भपिशवी फाटल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. गेल्या तीन दिवसांपासून प्रसूतीसाठी दाखल असताना, वेळीच प्रसूतीचा निर्णय न घेता स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळेच गर्भवती मातेला प्राण गमावावे लागले. जिल्हा रुग्णालय काय कारवाई करणार याकडे आता लक्ष आहे. 

नैसर्गिक प्रसुतीकडे लक्ष
पिंपळदच्या मंगला रवींद्र यादव (वय 28) असे दुर्दैवी गरोदर महिलेचे नाव आहे. मंगला यादव यांना प्रसूतीच्या कळा सुरू होताच जातेगाव आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी सीझर होत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या सोमवारी रात्री साडेदहाला दाखल केले. त्यानंतर तीन दिवस मंगल यांना त्रास होत असतानाही त्यांची नैसर्गिक पद्धतीने प्रसूती करू, असे सांगण्यात आले.

अखेर त्रास जाणवू लागला

मंगल यांना खूप त्रास होत असल्याने त्यांनी तत्काळ सीझर करण्याची विनंती डॉक्‍टरांकडे केली होती. बुधवारी सकाळी खूप त्रास होत असताना डॉ. अजित तिदमे यांनी प्रसूतीसाठी घेतले. मात्र त्या वेळी मंगला यांची प्रकृती बिघडल्याने झटके आले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या नातलगांनी हलगर्जीचा आरोप केल्याने इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. गर्भवती मंगल यांना दोन लहान मुले असून, बाळंतपणाची ही त्यांची तिसरी वेळ होती. यापूर्वीच्या दोन्ही प्रसूती नॉर्मल झाल्या होत्या. 
 
डॉ. तिदमेंची हलगर्जीच? 

शवविच्छेदन विभागात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धनश्री पाटील व फॉरेन्सिकतज्ज्ञ डॉ. हेमंत घंगाळे यांच्या समितीमार्फत इनकॅमेरा शवविच्छेदन झाले. यात गर्भवती मंगला यांची गर्भपिशवी फाटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनातून डॉ. तिदमे यांची हलगर्जीच कारणीभूत असल्याचेही समोर येते आहे. मंगल यांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढेपर्यंत डॉ. तिदमे काय करीत होते? गर्भवती स्वत: पोट प्रचंड दुखत असल्याचे सांगत असताना आणि सीझर करून मोकळे करा, अशी विनवणी करीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 


गर्भपिशवी फाटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. यात डॉक्‍टरांची हलगर्जी आहे की नाही, यासाठी स्वतंत्ररीत्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या समितीमार्फत चौकशी केली जाईल. त्यांच्या अहवालानुसार हलगर्जी सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल. 
-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा

मोठा निर्णय : नीता अंबानीची टीम पुढील हंगामात नव्या नावासह मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी...

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Daulat Sugar Factory Auction : दौलत साखर कारखान्याची होणार विक्री, ‘एनसीडीसी’कडून लिलावाची नोटीस; ९ ऑक्टोबरला ई-लिलाव

SCROLL FOR NEXT