live
live 
उत्तर महाराष्ट्र

पाणी,स्वच्छताचे राज्यातील कंञाटी कर्मचाऱ्यांचा १ पासून बेमुदत बंद  

सकाळ वृत्तसेवा

        नाशिक - राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. गेल्या सात वर्षात स्वच्छतेच्या , जाणीवजागृती ,सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन , संतगाडगेबाबा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम ,सार्वजनिक पिण्याचे पाणीगुणवत्ता स्रोतांचे मुल्यमापन, शौचालय वापराबाबत जनजागृती , स्वच्छता दर्पण असे विविध कार्यक्रम हे कर्मचारी यशस्वीपणे  राबवत असतांना  देखील केद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत हे कंञाटी कर्मचारींची दखल शासनाकडुन घेण्यात आली नाही यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीत कार्यरत कंञाटी कर्मचारीं शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक आॕगष्ट पासुन काम बंद करत संपाचे हत्यार उपसणार आहे.
    नाशिक जिल्ह्यातील तालुका समन्वयक सहभागी होणार असुन याचे निवेदन जिल्हापरिषदेचे अध्यक्ष , मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी ईशादिन शेळकंदे यांना नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे सचिव वैभव पाटील , गणेश सरोदे,मोहन वाघ,  संदिप पवार , माधव शेळके,यांनी याबाबत निवेदन देवुन मागण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.                                    
    गटसमन्वयक समुह समन्वयक यांना अनेक जिल्ह्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात चार पाच महिन्यापासुन मानधन मिळत नाही तर काही ठिकाणी अकरा महिन्यांची आॕर्डर संपुन देखील नवीन आॕर्डर मिळालेल्या नाहीत यामुळे अल्प मानधनात काम करत असतांना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर फिरण्यासाठी यांना काही अपघात झाला तर कुठलाही अपघाती विमा किंवा उपचारासाठी    आरोग्य विमा लागु नाही यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
   तीस हजार रूपये मानधन या महागाई च्या काळात मिळावे  यासाठी  शासनस्तरावर आजवर कुठलाही मानधन बाबत निर्णय होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र  राज्य गटसंसाधन केंद्र ( पाणी व स्वच्छता )कंञाटी  कर्मचारी संघटना मार्फत  पंचायत समितीत काम करणारे कंञाटी कर्मचारी दिनांक एक आॕगष्ट पासुन राज्यभरातुन  केंद्र शासनाच्या सुचनानुसार  मानधन वाढ मिळावी , वेळेवर मानधन व्हावे, अपघाती व आरोग्यविमा लागु करावा,सेवेत कायम करावे अशा विविध मागण्या घेऊन राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
   नाशिक जिल्ह्यातील  संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश भामरे ,अमोल आघाव , प्रशांत शिंदे , सुषमा पाटील , सचिन मुठे',दिपक भोये, समाधान कन्नोर ,सुनिल पाटणकर,आनंदा पवार, दिलीप गांगुर्डे , राहुल नाईक, प्रकाश भुसारे सह सर्व समन्वयक संपात सहभागी होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT