Dam in Jalyukt Shiwar Yojana filled due to rain. In the second photo, a farmer intercropping the papaya crop with a tractor esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Monsoon Rain : वरुणराजाच्या कृपेने बळीराजा खूश..! समाधानकारक पावसाने पिके तरारली; शेतीकामांना वेग

Nandurbar News : गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती. शेतामध्ये पाण्याचे तलाव साचले होते.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांची स्थिती उत्तम असून, त्यांची वाढदेखील जोमाने होत आहे. शेतकरी चांगलाच आनंदित झाला असून, पाऊसदेखील अधूनमधून हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता जवळजवळ मिटली आहे. अधूनमधून पावसाची रिप-रिप सुरूच असून, शेतीकामांना वेग आला आहे. (Nandurbar Crops flourished with satisfactory monsoon rains)

गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती. शेतामध्ये पाण्याचे तलाव साचले होते. या जोरदार पावसामुळे पिकांना पूर्णतः जीवदान मिळाले आहे. एवढेच नव्हे तर जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आल्याने मोठी मदत मिळाली आहे. नद्या प्रवाहित झाल्या आहेत. सातपुड्यातील उनपदेवजवळील दरा व चिरडे धरणे पूर्ण क्षमतेने भरून ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. शिवाय सुसरी राणीपूर दुधखेडा धरणांमध्ये चांगल्या प्रकारे साठा निर्माण झाला आहे.

कापूस, मिरचीला संजीवनी

शेतकऱ्यांनी मे महिन्यात लागवड केलेल्या कापूस व मिरची पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात केळी, पपई, कापूस, मिरची पिकांची लागवड सर्वाधिक आहे. जिल्ह्यात पपई व केळीची सर्वाधिक शहादा तालुक्यात लागवड केलेली आहे.

ही पिके तीन ते चार फूट उंचीची झाली आहेत. मिरची पिकाची स्थितीदेखील उत्तम झालेली आहे. गेल्या वर्षी शहादा तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. या वर्षी मात्र शेतकऱ्यांनी मका पिकावर भर दिला आहे. पावसामुळे सारीच पिके डोलायला लागली आहेत. (latest marathi news)

शेतमजुरांना रोजगार

शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिकांना दोन ते तीन वेळा रासायनिक खत दिल्याने पिकांची वाढ लवकर झाली आहे. आता शेतकऱ्यांनी पुन्हा खत टाकायला सुरवात केली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी केली जात आहे. एकप्रकारे पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.

सर्वत्र शेतीकामांना वेग आलेला आहे. विशेष म्हणजे पिकांमध्ये गवत अर्थात तण अधिक वाढल्याने ते काढण्यासाठी बाहेरगावाहून शेतमजूर आणावे लागत आहेत. शेतमजुरांनादेखील रोजगार मिळाला आहे. जनावरांना चारा उपलब्ध झालेला आहे. चारा विक्री करणारे सक्रिय झाले आहेत.

"या आठवड्यात पावसाने वेळोवेळी हजेरी लावल्याने व अधूनमधून जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायक आहे. शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळले आहे. पिकांना खत देणे व पिकांमधील गवत काढणे यासाठी आता शेतकरी कार्यमग्न झाला आहे. आणखी दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस होणे अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दूर होईल."

- कैलास पाटील, शेतकरी, जावदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT