उत्तर महाराष्ट्र

'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'

सकाळवृत्तसेवा

अमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे मुद्दे टाळत असून, मनुवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सरकार संविधानविरोधी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. 

जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनिल पाटील, जिल्हा बॅंकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, विनोद कदम, सुनील शिंपी, डॉ. हेमंत कदम, देविदास देसले, योजना पाटील, प्रा. रंजना देशमुख, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, दिनेश पाटील यावेळी उपस्थित होते. 

श्री. भुजबळ म्हणाले, की नरेंद्र मोदींनी सोशल मिडियासह पत्रकारांच्या लेखणीवर बंधने आणले आहेत. व्यक्‍ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. त्यामुळे असंवेदनशिलताही वाढली आहे. भाजपचे सर्व्हे फेल ठरले असून, जनतेचा विश्‍वासही उडाला आहे. मात्र, हे सरकार जनता विरुद्ध राहुल गांधी असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप प्रत्येक वेळी निवडणुकीवेळी राम मंदिरसारखे भावनिक मुद्दे पुढे करून निवडणुका लढविते. मात्र, शरद पवार यांनी कधीही असे मुद्दे न घेता शेतकरी व जनतेच्या हिताशी निगडित असलेलेच प्रश्‍न मांडून निवडणुका लढविल्या आहेत. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे. मोदींनी संवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या सरकारकडे नोकऱ्याच नसल्याने या आरक्षणाचा उपयोग काय? भाजपला देशाचे संविधानदेखील मान्य नसून, राज्यसभेत बहुमत असले तर आम्ही घटना बदलून दाखविली असती. त्यामुळे सद्यःस्थितीत नरेंद्र मोदींविरूद्ध संविधान अशी परिस्थिती झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT