उत्तर महाराष्ट्र

‘नांदूरमध्यमेश्‍वर’मध्ये आठ हजार पर्यटकांनी दोन महिन्यांत लुटला पक्षीनिरीक्षणाचा आनंद

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. दोन महिन्यांत आठ हजार पर्यटकांनी पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटला. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यभरातील पर्यटकांचाही समावेश आहे.

वन्यजीव संरक्षक एन. आर. प्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक वृद्धीसाठी वन विभागाने विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. ‘इको टेंट’, तंबू, निसर्ग परिचय केंद्राला पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचवेळी ग्रामस्थांच्या स्टॉलवर खाद्यपदार्थांची चव आवर्जून चाखली जात आहे. दोन महिन्यांत एक हजार १८२ चारचाकी वाहनांमधून पर्यटक आले. चारशे तेरा जणांनी दुर्बिणीद्वारे पक्षीनिरीक्षण केले. ३४ गटांनी ‘गाइड’ करून परिसराची माहिती जाणून घेण्यात रस दाखवला. त्यातून अभयारण्याला दोन लाख ६५ हजार ७०० रुपयांचे उत्पन्नही मिळाले.

वन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे पर्यटकांच्या संख्येत दोन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने वीज उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून ऑइल इंजिनच्या सहाय्याने पाण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी दिली. ते म्हणाले, की पर्यटकांकडून काही अपेक्षा आहेत. पक्ष्यांच्या घरट्यांना हात लावू नये, गोंगाट करू नये, खेळू नये, कचरा टाकण्यात येऊ नये, धरणाच्या पाण्यात उतरू नये, शेतातील ऊस-द्राक्ष-भाजीपाला तोडू नये या बाबींचा त्यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT