market committee
market committee esakal
नाशिक

कृषी उत्पन्न बाजार समितीत उलाढाल ठप्प; बंदचा बळीराजाला मोठा फटका

दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोनाचा फटका (corona virus) सर्वच आस्थापनांना कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (nashik market committee) व तिच्या उपबाजारांत रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र गत सहा दिवसांपासून समितीचे कामकाज बंद असल्याने तीस कोटी रुपयांची ( उलाढाल ठप्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Agricultural Market Committee closed due lockdown)

कामकाज ठप्प

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिंडोरी रोडवरील समितीत फळभाज्या, पालेभाज्या व अन्य शेतमालाचा लिलाव, तर कांदे, बटाटे, लसूण व अन्य मालाचा व्यवहार पेठ रोडवरील शरदचंद्र बाजार समितीत होतो. याशिवाय समितीचे त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूलसह नाशिक रोड येथे उपबाजार आहे. मुख्य बाजार समितीसह उपबाजार समिती आवारात रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. परंतु प्रशासनाने १२ मार्चला दुपारपासून कडकडीत बंदचे धोरण स्वीकारल्याने मुख्य समितीसह उपबाजार समिती आवारातील कामकाज ठप्प झाले आहे. याचा फटका समितीसह बळीराजालाही बसला आहे.

अनेकांवर उपासमारीची वेळ

कोरोनाची चेन ब्रेक होण्यासाठी प्रशासनाने १२ तारखेपासून येत्या ३१ तारखेपर्यंत काही अपवाद वगळता सर्वत्र क्षेत्रात कडकडीत बंदची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या मुख्य बाजार समितीसह उपबाजारांतील सर्वच व्यवहार थंडावल्याने समितीत कार्यरत हमाल, मापारी, चवली दलालांसह लहान-मोठ्या व्यावसायिक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

बळीराजाचे मोठे नुकसान

कृषी उप्तन्न बाजार समितीत रोज सकाळ, सायंकाळ लिलाव होतात. यातून नाशिकसह दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्‍वर, गिरणारे आदी भागातून पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन रोज कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांची प्रमुख अर्थवाहिनी ठरली आहे. मात्र गत पाच-सहा दिवसांपासून समितीच्या प्रवेशद्वारच बंद झाल्याने, तसेच शेतमाल नाशवंत असल्याने मिळेल त्याठिकाणी व त्यादराने विक्री करावी लागते. त्यातच एकीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दुसरीकडे समितीही बंद असल्याने अस्मानी अन् सुलतानी अशा दोन्ही आघाड्यांवर शेतकऱ्यांना लढा द्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

गत १२ तारखेपासून मुख्य बाजार समितीसह उपबाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत. याठिकाणी रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे गत सहा दिवसांत तब्बल ३० कोटींची उलाढाल थंडावली आहे. -अरुण काळे, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT